Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हम दो, हमारे दो… मोदीजी अदानीजींवर चर्चा न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील

Advertisements
Advertisements
Spread the love

अदानी समूहावर झालेल्या फसवणुकीच्या आरोपांवरून विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. या मुद्द्यावरून सोमवारी (६ फेब्रुवारी) संसदेच्या दोन्ही सभागृहात आज देखील गदारोळ झाला, त्यानंतर कामकाज मंगळवारपर्यंत (७ फेब्रुवारी) तहकूब करण्यात आले. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.

Advertisements

राहुल गांधी यांनी सोमवारी सांगितले की, संसदेत अदानी मुद्द्यावर कोणतीही चर्चा होऊ नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. अदानी प्रकरण संसदेत चर्चिले जावे असे सरकारला वाटत नाही, ते घाबरले आहे. सरकारने यावर संसदेत चर्चा होऊ द्यावी. यावर संसदेत चर्चा व्हायला हवी, अदानी यांच्यामागे कोणाची ताकद आहे, हे देशाला कळायला हवे. मी सरकारबद्दल खूप दिवसांपासून म्हणत आलो आहे की ‘हम दो, हमारे दो’. आता मोदीजी अदानीजींवर चर्चा न करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील तुम्हाला कारण माहित आहे. मी २-३ वर्षभरापासून हा मुद्दा मांडतोय. मला दुधाचे दूध पाणी करायचे आहे. लाखो कोटींच्या या भ्रष्टाचारावर चर्चा व्हायला हवी.

Advertisements
Advertisements

अमेरिकेतील शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अहवाल प्रसिद्ध केला असून अदानी समूहाने शेअर्समध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हायला हवी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. मात्र, अदानी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

 

नऊ महिन्यांच्या चिमुकल्याचा पिठाच्या भांड्यात पडल्याने मृत्यू


Mahanayak news Updates on one click
https://www.mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!