CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 500 तर 38 नवे रुग्ण , तीन मृत्यू

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 495 कोरोनामुक्त, 500 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 68 जणांना (मनपा 10, ग्रामीण 58) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 495 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 38 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 437 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 442 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 500 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (16)
घाटी 2, टिळक नगर 1, एन-5 सिडको 1, अन्य 12
ग्रामीण (22)
वाळूज एमआयडीसी 1, दहिगाव 1, आठेगाव खेडा 1, हट्टी, विरगाव 1, आंभई, सिल्लोड 1, अन्य 17
मृत्यू (02)
घाटी (01)
1. पुरूष/55/शेवगा, करमाड, औरंगाबाद.
खासगी रुग्णालय (01)
1. पुरूष/75/ नांदराबाद, ता.खुलताबाद