लोककवी गदर काळाच्या पडद्याआड , अनेक मान्यवरांची श्रद्धांजली …
हैद्राबाद : भारतीय कवी आणि कार्यकर्ते, गदर यांचे रविवारी ६ ऑगस्ट रोजी निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. गुम्मडी विठ्ठल राव हे त्यांचे नाव होते. त्यांना हृदयविकाराचा गंभीर आजार असल्याने त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, लोकप्रिय कवी गुम्मडी विठ्ठल राव यांचे फुफ्फुस आणि लघवीच्या समस्या आणि वृद्धापकाळामुळे निधन झाले.त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. २० जुलै रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ३ ऑगस्ट रोजी त्याच्यावर यशस्वी बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
तथापि, कवी गद्दर यांना फुफ्फुस आणि लघवीची समस्या होती. जी त्याच्या वाढत्या वयाबरोबर वाढत गेली, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “प्रख्यात कवी” यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून ट्विट करत म्हटले आहे की, तेलंगणातील प्रख्यात कवी, गीतकार आणि कार्यकर्ते श्री गुम्मडी विठ्ठल राव यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. तेलंगणातील लोकांवरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांना उपेक्षितांसाठी अथक लढण्याची प्रेरणा मिळाली. त्यांचा वारसा आम्हा सर्वांना प्रेरणा देत राहील.
दरम्यान, २ जुलै रोजी तेलंगणातील खम्मम येथे राहुल गांधींनी संबोधित केलेल्या काँग्रेसच्या जाहीर सभेत गदर उपस्थित होते. केंद्रीय मंत्री आणि तेलंगणा भाजपचे अध्यक्ष जी किशन रेड्डी, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर अनेक नेत्यांनी गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.