Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेस सत्तेत आल्यास देशाचे तुकडे , राम मंदिराच्या सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार घातला , त्यांचे काय करायचे ते तुम्हीच बघा : नरेंद्र मोदी

Spread the love

कोल्हापूर : येथील प्रचार सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, इंडिया आघाडी आणि नकली शिवसेना म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केले. गेली अनेक दशके काँग्रेसने राम मंदिर बांधू दिले नाही . त्यांनी राम मंदिराच्या सोहळ्यावर बहिष्कार घातला. त्यांचं काय करायचं ते तुम्हीच बघा. सत्तेत आल्यास काँग्रेस तुमच्या संपत्तीची, महिलांचे दागिने यांची चौकशी करणार आहे. काँग्रेस अशा लोकांना तुमची संपत्ती वाटतील ज्यांचा या देशावर पहिला हक्क आहे हे सांगितलं जातं. लांगुलचालनासाठी काँग्रेसचे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. त्यांचं सरकार आलं तर ते काश्मीरमध्ये कलम ३७० परत लागू करतील. सीएए रद्द करतील असं सांगत आहेत. काँग्रेस आणि इंडि आघाडीकडून हे लांगुलचालन केलं जातं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली.

लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (27 एप्रिल) महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले. येथे काँग्रेसवर निशाणा साधत त्यांनी म्हटले आहे की, काँग्रेसचा एकच अजेंडा आहे – सरकार बनवा आणि पैसे कमवा.

बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना होत असतील ?

दरम्यान ज्या लोकांना तीन अंकी आकडा गाठता येत नाही विचार करा की , ते सरकारच्या दारापर्यंत तरी पोहोचू शकतील का ? असा प्रश्न उपस्थित करून मोदींनी काँग्रेसला हिणवण्याचा प्रयत्न केला.उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल करताना मोदी म्हणाले , डीएमके हा काँग्रेसचा जवळचा पक्ष त्यांनी काय म्हटलं? सनातन धर्म डेंग्यूसारखा आहे. अशा लोकांचा सत्कार काही लोक महाराष्ट्रात बोलवून करतात. हे पाहून बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला किती यातना होत असतील. छत्रपती शिवरायांच्या भूमीत जे औरंगजेबाला मानतात अशा लोकांशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली आहे. नकली शिवसेना या सगळ्या अजेंड्यात काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून चालते आहे. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा तळतळत असेल. जे काही कारनामे चालले आहेत ते पाहून त्यांच्या आत्म्याला यातना होत असतील असे म्हणत मोदींनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

काँग्रेसचे युवराज आहेत त्यांनी घोषणा केली आहे की ते तुमच्या संपत्तीची, महिलांचे दागिने यांची चौकशी करणार आहेत. काँग्रेस अशा लोकांना तुमची संपत्ती वाटतील ज्यांचा या देशावर पहिला हक्क आहे हे सांगितलं जातं. लांगुलचालनासाठी काँग्रेसचे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात. काँग्रेसने घोषणा केली आहे की जे आयुष्यभर कमवाल, जी काही जमापुंजी ठेवाल ती तुमच्या मुलांना, पुढच्या पिढीला मिळणार नाही. काँग्रेसच्या युवराजांनी फॉर्म्युला आणला आहे की तुम्ही हयात नसाल तर तुमच्या जमापुंजीतला अर्धा हिस्सा वसुल करण्यासाठी तयार आहे. ही सरळ सरळ लूट आहे. काँग्रेसचं हे स्वप्न तुम्ही अपूर्ण ठेवायचं आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

महिलांचे दागिने आणि सोन्या-चांदीची चौकशी केली जाईल…

काँग्रेसच्या राजपुत्राने आपली मालमत्ता आणि महिलांचे दागिने आणि सोन्या-चांदीची चौकशी केली जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केला. काँग्रेस तुमची कमाई ज्यांचा त्यावर पहिला हक्क आहे त्यांच्यात वाटून देईल. तुष्टीकरणासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जाऊ शकते. काँग्रेस नेते देश तोडून वेगळ्या देशाची मागणी करत असल्याचा दावाही केला. ते म्हणाले, “कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये काँग्रेस आणि भारत आघाडीचे लोक भाषणे देत आहेत, दक्षिण भारताचे विभाजन करून वेगळ्या देशाची मागणी करत आहेत, हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी कधी स्वीकारू शकेल का?

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!