Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धार्मिक कार्यक्रमात तीन हजारांहून अधिक भाविकांना झाली विषबाधा

Spread the love

नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात संत बाळू मामाच्या धार्मिक कार्यक्रमात भगर खाऊन तीन हजारांहून अधिक भाविकांना विषबाधा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  मंगळवारी बाळू मामाच्या मेंढ्या कोष्टवाडी गावात आल्या.

त्यानिमित्त संत बाळूमामाच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रात्री आरतीच्या कार्यक्रमानंतर भंडारा झाला. काल एकादशी असल्याने भाविकांना महाप्रसाद म्हणून भगर देण्यात आली होती.

या कार्यक्रमासाठी सुमारे पाच हजार भाविक इथे जमले होते. रात्री आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मंगळवारी एकादशी असल्याने प्रसादात भगर आणि शेंगदाण्याची कढी होती.  भगर खाल्ल्यानंतर भाविकांना अचानक उलट्या, मळमळ, चक्कर येणे अशा समस्या सुरू झाल्या.

या कार्यक्रमाला कोष्टवाडी या गावासह सावरगाव, हरणवाडी , पेंडु , सादलापुर या गावातील नागरिक आले होते. त्यांना देखील विषबाधा झाली. विषबाधा झालेल्यांमध्ये महिलांचा समावेश अधिक आहे. भाविकांना त्रास व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्यांना मिळेल त्या वाहनांनी रुग्णालयात पाठवण्यात आले.

लोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. रुग्णांची संख्या जास्त असल्याने नांदेडच्या शासकीय रुग्णालयातही रुग्ण दाखल करण्यात आले आहे. रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले आहे.

दरम्यान, सुमारे 550 भाविकांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात, तर काही रुग्णांना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातही काही परतलेल्या भाविकांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे.

नेमकी ही विषबाधा नकश्यामुळे झाली हे तपासण्यासाठी अन्न औषध प्रशासन आणि आरोग्य पथक कोष्टवाडी गावात दाखल झाले असून त्यांनी कालच्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात जाऊन विषबाधा झालेल्यांची विचारपूस केली आहे. जवळपास तीन हजार लोकांना विषबाधा झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे.

परभणी ग्रामस्थांनाही झाली विषबाधा

परभणीत कार्यक्रमातून परतलेल्या 100 भाविकांना जुलाब उलटीचा त्रास झाला लोकांना हा त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर गावकऱ्यांना भगरीतून विषबाधा झाल्याचे लक्षात आले. रात्री उशिरा नागरिकांनी परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

माहिती मिळताच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आरोग्य विभागासह गावातील ग्रामस्थांवर उपचार सुरू केले, तर काहींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

 

शरद पवार गटाचे नवे नाव… नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!