Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaaharashtraNewsUpdate : सोशल मीडियावर वादग्रत पोस्ट केल्यामुळे सातारा जिल्ह्यात उसळली दंगल

Advertisements
Advertisements
Spread the love

सातारा : महाराष्ट्रातील साताऱ्यात तणावाचे वातावरण आहे. दोन समुदायांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाल्याची नोंद आहे. तसेच एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील पुसे सावळी येथे 15 ऑगस्टपासून सोशल मीडियावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या पोस्ट टाकण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. महापुरुषांबद्दलही वादग्रस्त टिप्पणी करण्यात आली. त्यानंतर रात्री हे प्रकरण वाढत गेले आणि एका मंदिरावर, धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली आणि वाद वाढला. पोलिसांनी बळाचा वापर करून लोकांना हटवले. दरम्यान, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. जिल्हा पोलिसांनी खबरदारी म्हणून इंटरनेट बंद केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात रविवारी कथित आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टवरून जातीय संघर्ष झाला, ज्यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आणि अनेक घरे पेटवण्यात आली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सातारा जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. सातारा जिल्हा मुख्यालयापासून 50 किमी आणि पुण्यापासून 160 किमी अंतरावर असलेल्या पुसेसावळी गावात ही चकमक झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Advertisements

काय म्हणाले पोलीस अधिकारी?

सातारा जिल्हा पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, परिसरातील एका विशिष्ट समाजातील काही तरुणांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे रविवारी रात्री 9.30 च्या सुमारास हाणामारी झाली. यात एक जण गंभीर जखमी झाला असून अनेक घरांना आग लागली आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. “आम्ही खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली आहे.”

Advertisements
Advertisements

सातारा पोलिसांचे जनतेला आवाहन

सातारा जिल्हा प्रशासनानेही आपल्या सोशल मीडिया हँडलवर जनतेला आवाहन पोस्ट केले आहे. सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी केलेले आवाहन, सातारा जिल्ह्यातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लोकांनी सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण करणारी आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी कोणतीही सामग्री पोस्ट करणे टाळावे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!