Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad NewsUpdate : कचऱ्याचे ट्रकने दुचाकीस चिरडले, पती-पत्नी ठार , आंबेडकर चौकात भीषण अपघात

Spread the love

औरंगाबाद : कचऱ्याची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडले. हा अपघात सोमवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास आंबेडकर नगर चौकात घडला. प्रकाश सूर्यभान जाधव (वय 35), मोनिका प्रकाश जाधव (वय 28) दोघे राहणार शहनुरवाडी परिसर असे अपघातात ठार झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.

जाधव दाम्पत्य भाजीपाला विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत होते. सोमवारी सकाळी दोघेही पती पत्नी जाधववाडी येथून भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. भाजीपाला घेतल्यावर सामानाच्या पिशव्या दुचाकीस अडकवून दोघेही परत आपल्या घराकडे येत होते . आंबेडकर नगर चौकात असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपा समोरील चौकातून जाधव दाम्पत्य वळण घेत असताना, सिडको बस स्थानक चौकातून हर्सूल टी पॉइंट कडे जात असलेले कचऱ्याचे ट्रकने जाधव दांपत्याच्या दुचाकीस धडक दिली . अपघातानंतर ट्रकने दुचाकीस 10 ते 15 फुटापर्यंत फरफटत नेले होते. या भीषण अपघातात मोनिका जाधव यांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या तर गंभीर जखमी झालेल्या प्रकाश जाधव यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद सिडको पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

कौटुंबिक कलहातून मुलीचा जीव घेऊन आईने केली आत्महत्या

औरंगाबाद शहरात कौटुंबिक कलहातून एका आईने आपल्या तेरा वर्षीय मुलीचा जीव घेऊन स्वत:ही केली आत्महत्या. मुकुंदवाडी भागातील म्हाडा कॉलनीतील तोरणागड सोसायटी येथे घडली घटना. मृत आईचे नाव आशा दिपक गायकवाड (३१) तर मुलीचे नाव ऋतूजा दिपक गायकवाड

आपलं सरकार

Click to listen highlighted text!