Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mission Shakti : मोदींच्या भाषणानंतर… कोण काय म्हणाले ? राज ठाकरे

Advertisements
Advertisements
Spread the love

एक अंतर्गत चाचणी म्हणून शास्त्रज्ञांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. त्याबद्दल शास्त्रज्ञांचं अभिनंदन. पण ही बातमी पंतप्रधान मोदींना सांगण्याची गरज काय? शास्त्रज्ञांचं कर्तृत्व आहे, ते त्यांनाच सांगू द्या, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना लगावला आहे.

Advertisements

‘मिशन शक्ती’ अभियानांतर्गत क्षेपणास्त्राद्वारे अंतराळात एक उपग्रह पाडण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आलं आहे. त्याची माहिती आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. त्यावर सोशल मीडियावरून भाजपची खिल्ली उडवली जात असतानाच राज ठाकरे यांनी खास ठाकरी शैलीत मोदींवर टीका केली आहे. आम्हाला आमच्या शास्त्रज्ञांचा अभिमान आहे. आम्ही त्यांचं अभिनंदनच करतो. पण म्हणून मोदींनी देशाला संबोधित करून ही बातमी सांगायची काय गरज होती? हे शास्त्रज्ञांचं कर्तृत्व आहे. त्यांनाच सांगू द्या. त्यांनाच त्याची प्रसिद्धी मिळवू द्या, असा चिमटाही राज यांनी काढला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!