Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जयपूर शहरातील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींना फाशी

Advertisements
Advertisements
Spread the love

विशेष न्यायालयाने जयपूर शहरात २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींना  फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सैफुर रेहमान, सरवर आझमी, मोहम्मद सैफ आणि सलमान अशी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणातील पाचवा आरोपी शाहबाज हुसेनची मात्र सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

Advertisements

जयपूरमधील परकोटे भाग ८ मध्ये १३ मे २००८ रोजी  झालेल्या  साखळी बॉम्बस्फोटांमुळे हा परिसर  हादरला होता. या बॉम्बस्फोटांत ८० निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता तर १७६ जण जखमी झाले होते. या प्रकरणातील दोन आरोपींना दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले होते तर चार आरोपींना दोनच दिवसांपूर्वी १८ डिसेंबर रोजी जयपूरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले होते. या चारही आरोपींना आज शिक्षा ठोठावण्यात आली. गेल्या ११ वर्षांपासून हा खटला प्रलंबित होता.

Advertisements
Advertisements

जयपूर बॉम्बस्फोटातील तीन दहशतवाद्यांचा देशातील अन्य भागांत झालेल्या बॉम्बस्फोटांतही सहभाग असल्याचे आढळून आले होते. जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी एकूण ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर प्रत्यक्षात न्यायालयात चार आरोपपत्रं दाखल करण्यात आली होती. दरम्यान जयपूर बॉम्बस्फोट खटल्यातून शाहबाज हुसेन या आरोपीला दोषमुक्त करण्यात आले आहे. शाहबाजविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेणारा जो ई-मेल पाठवण्यात आला होता तो शाहबाजने पाठवल्याचा आरोप होता. अन्य चार आरोपींना भादंवि कलम १२० ब अन्वये दोषी धरण्यात आले आहे. या प्रकरणी विशेष न्यायाधीश अजयकुमार शर्मा यांनी सहा महिन्यांपूर्वी निर्णय राखून ठेवला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!