Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : गैरहजर राहणाऱ्या तीन पोलिसांचे आयुक्तांकडून निलंबन

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : विधानसभा निवडणूकीच्या बंदोबस्त कामासाठी नियुक्ती असतांना देखील कामचुकारपणा करणा-या तीन पोलिस कर्मचाNयांना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी (दि.१५) तडकाफडकी निलंबित केले असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांनी दिली.

Advertisements

डॉ . कोडे यांनी याबाबत म्हटले आहे कि , अरूण सुर्यकांत लकडे (जवाहरनगर) ३ सप्टेंबरपासून , दिलीप नामदेव कदम (पुंडलिकनगर) ६ सप्टेंबरपासून , तर सावळाहरी दगडू खंडागळे (एमआयडीसी सिडको) २५ जूनपासून बेकायदेशीरपणे गैरहर आहेत . त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणूकीनिमित्ताने शहरात गेल्या काही दिवसापासून विविध राजकीय पक्षाच्या व्हीआयपी नेत्यांची ये-जा सुरू आहे. यानिमित्ताने शहरात अधिक पोलिसांची बंदोबस्तासाठी गरज आहे परंतु सदर पोलीस कर्मचारी संबंधित तारखांपासून गैरहजर आहेत. या तिघांना निलंबित करण्यात आल्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!