एसआयटीला मी घाबरत नाही… आमच्या आयांना तुम्ही मारले तेव्हा एसआयटी नेमणारे कुठे गेले होते?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज (२७ फेब्रुवारी) केली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला आमदार आशिष शेलार यांनी ही मागणी केली.
ज्यानंतर त्यांची ही विधानसभा अध्यक्षांकडून मान्य करण्यात आली. दरम्यान, मी अशा एसआयटी चौकशींना घाबरत नाही, असे म्हणत मनोज जरांगेंनी दर्पोक्ती केली आहे. तसेच यावेळी त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला आहे.
विधानसभेत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात येणार, असल्याची घोषणा झाल्यानंतर जरांगे सरकारविरोधात पुन्हा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख न करता म्हटले की, मी बोललो तर त्यांना किती वाईट वाटले. ज्यावेळी त्यांच्यामुळे आमच्या महिलांना, आयांना, बहिणींना त्रास झाला.
त्यांनी गोळीबार केला, त्यावेळी आम्हाला किती वाईट वाटले असेल. त्यावेळी 20-20 पोलिसांकडून एका-एकाला मारहाण करण्यात येत होती. त्यावेळी उचलून आपटण्यात आले, असा आरोपही आता जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.
तुमचे फक्त आई म्हटलो की, तरी तुम्हाला वाईट वाटले. आमच्या आयांना तुम्ही मारले तेव्हा एसआयटी नेमणारे कुठे गेले होते? सत्ता हातात आली म्हणून त्याचा दुरुपयोग करून माझ्या भगिनींना त्याचा त्रास करून देऊ का? पण मी असे काहीही होऊ देणार नाही.
त्यामुळे तुमच्या या एसआयटीला मी घाबरत नाही. मराठ्यांना त्रास देण्यात येणार असेल, तर ते सहनही केले जाणार नाही, असेही पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून प्रसार माध्यमांसमोर सांगण्यात आले आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765