बंगालमध्ये एनआरसी लागू होणार नाही, ममता बॅनर्जी यांनी भाजपवर साधला निशाणा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपवर निशाणा साधला. ममता म्हणाल्या की, निवडणुकीच्या निमित्तानेच, भाजप निवडणुकीपूर्वी सीएएच्या घोषणा करत आहे. मात्र बंगालमध्ये एनआरसी लागू होणार नाही असे त्यांनी सांगितले.
सत्ताधारी जे काही बोलत आहेत ते केवळ निवडणुकीमुळेच बोलत आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी प्रत्येकाला 15 लाख रुपये दिले जातील असे त्यांनी सांगितले होते. ते निवडणुकीपूर्वी खूप काही बोलतात.
ममता बॅनर्जीं भाजपवर निशाणा साधत म्हणाल्या, ‘बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ’ असे म्हणतात पण प्रत्यक्षात ते खोटे बोलतात आणि दंगली भडकवतात. तसेच सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका, त्याची उलट तपासणी करा, जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर थेट पोलिसांकडे जा.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी आरोप केला की भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लोकांची बँक खाती आणि आधार कार्ड “निष्क्रिय” केले आहेत जेणेकरून त्यांना सरकारच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजनांमध्ये प्रवेश नाकारला जाईल.
बीरभूम जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसले तरीही त्यांचे सरकार विविध राज्य-कल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना पैसे देणे सुरू ठेऊ.
‘शेतकऱ्यांचे काय चाललंय?’
शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत सीएम ममता म्हणाल्या की, जे शेतकरी संपूर्ण देशासाठी अन्नधान्य निर्माण करतात, त्यांना कसे वागवले जात आहे? पंजाब, दिल्ली आणि हरियाणा जळत आहे. शेतकऱ्यांवरील हल्ल्याचा मी निषेध करते, असेही त्या म्हणाल्या.
केंद्र सरकार आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील लोकांचे आधार कार्ड निष्क्रिय करत असून, त्यामुळे राज्य सरकारच्या विविध सामाजिक कल्याणकारी योजनांचा लाभ त्यांना त्यांच्या बँक खात्यातून मिळू नये, असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765