Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विलासराव देशमुख यांचे पूत्र काँग्रेस सोडणार नाहीत, राजकारणाच्या घसरत्या पातळीवर बोलले रितेश देशमुख

Spread the love

अमित देशमुख यांच्याकडून लातूरच्याच नव्हे, तर महाराष्ट्रालाही खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे आता तुम्ही पुढचे पाऊल टाका, असे मत अभिनेता रितेश देशमुख याने व्यक्त केले आणि आपला मोठा भाऊ आणि आमदार अमित देशमुख यांनी आता महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

लातूर तालुक्यातील निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी रितेश देशमुख बोलत होते.

दरम्यान, व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे, आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख, दिलीपराव देशमुख, उल्हास पवार आणि देशमुख कुटुंबीय उपस्थित होते.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मराठवाड्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विलासराव देशमुख यांच्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडे मराठवाड्यातील काँग्रेसचे मोठे नेते म्हणून पाहिले जात होते. रितेश देशमुख यांनी त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या नेतृत्वाच्या पोकळीची जाणीव करून दिली.

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर सर्वांचा नजरा या विलासराव देशमुख यांचे पूत्र अमित आणि धीरज आता काय निर्णय घेणार याकडे लागले होते. त्यावर त्यांनी आम्ही काँग्रेस सोडणार नाही, असे स्पष्ट केले.

आमदार अमित देशमुख हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री होते. त्यांची भाषणशैली ही वडील विलासराव देशमुख यांच्याप्रमाणेच असल्याचे मानले जाते. मात्र अमित देशमुख अजुन राज्याचे नेते म्हणुन पुढे आलेले नाहीत.

रविवारी लातूरमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने रितेश देशमुख यांनी आमदार अमित देशमुख यांनी आता पुढे येऊन काम करावे, असे सुचवत राज्यातील काँग्रेसचे नेतृत्व म्हणून त्यांनी काम करावे अशी इच्छा व्यक्त केली आहे.

वैयक्तिक टीका राजकारणात करू नका

समाज आणि कुटुंबात वेगवेगळ्या भूमिका बजावताना तुम्ही लोकांशी कसे वागता हेच खरे भांडवल आहे. माझे आजोबा आणि वडील विलासराव यांचे नाते अतिशय आदराचे होते. आजोबांनी आपला मुलगा मुख्यमंत्री झाल्याचं कौतुक केलं, पण त्यांना कोणत्याही गोष्टीचा त्रास झाला तर त्यांनी हक्काने त्यांना सांगितल्या. रितेश देशमुख यांनी या गोष्टींची सांगून, राजकारणावर टीका करताना वैयक्तिक टीका करू नका, असे आजोबांनी सांगितले होते. असे देखील सांगितले.

विलासरावांच्या आठवणींना रितेश देशमुख भावूक

विलासराव देशमुख यांच्या निधनाला बारा वर्षे झाली आहेत, असे सांगत रितेश देशमुख भावूक झाले. त्यावेळी अमित देशमुख यांनी त्यांच्याजवळ येत रितेश यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना धीर दिला.

त्यानंतर रितेश यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली. विलासराव देशमुख यांची वडील म्हणून उणिव अजुनही भासते. मात्र याकाळात काका दिलीपराव देशमुखांनी वेळोवेळी साथ दिली. काकांबद्दल बोलायला फारसा वेळ मिळत नाही. पण त्यांची साथ ही मोलाची असते असे ही रितेश देशमुख यांनी सांगितले.

ही घटना आम्हाला बाबांनी म्हणजेच विलासरावांनी सांगितली असल्याचे रितेश देशमुख यांनी सांगितले. हे सांगण्याचे कारण म्हणजे, समाजात वावरताना ही खबरदारी आपण घेतली पाहिजे, यालाच संस्कार म्हणतात.

आम्हा सर्व बांधवांनी हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. आजकाल राजकारणात ज्या पातळीवर भाषणे दिली जातात, त्या महाराष्ट्रावर एकेकाळी थोर नेत्यांचे राज्य होते, ते आज दिसत नाही, हे पाहून वाईट वाटते.

भावाला काय देता येईल हा देशमुख बंधूंचा विचार – रितेश देशमुख

विलासराव देशमुख आणि दिलीपराव देशमुख या दोन्ही भावांमध्ये कधीही अंतर पडले नाही. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तरी दिलीपरावांनी त्यांच्याकडून मला काय मिळेल याचा कधीही विचार केला नाही, तर कायम मला त्यांना काय देता येईल याचा विचार केला. दोन्ही भावांमधील हे नातं शेवटपर्यंत कायम राहिले आणि आता पुतण्यांनाही ते साथ देत असल्याचे रितेश देशमुख यांनी सांगितले.

काका-पुतण्याचे नाते प्रेमाचे असावे

विलासराव आणि दिलीपराव एकमेकांना भाऊ मानायचे, या दोन भावांना एकमेकांकडून काय मिळणार? असा विचार कधीच केला नव्हता. विलासराव आणि दिलीपरावांनी हाच संदेश दिला की आपण आपल्या भावाला कसा आधार देऊ शकतो. 12 वर्षांपूर्वी विलासरावांचे निधन झाले, पण आम्हाला आमच्या वडिलांची उणीव भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिले.

काकांबद्दल बोलायला फारसा वेळ मिळत नाही, पण आज मी सर्वांना सांगतो काका, माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. काका-पुतण्याचे नाते कसे असावे याचे ज्वलंत उदाहरण आज तुमच्यासमोर आहे, असेही रितेश देशमुख म्हणाले.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!