EDNewsUpdate : धाडी टाकण्यासाठी गेलेल्या ईडीच्या पथकावर गावकऱ्यांच्या जमावाने केला हल्ला
कोलकाता : रेशन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाचे पथक पश्चिम बंगालमध्ये सातत्याने छापे टाकत आहे. दरम्यान, शुक्रवारी ईडीचे पथक छापे टाकण्यासाठी उत्तर 24 परगणा येथे पोहोचले तेव्हा, ईडीच्या पथकाला गावकऱ्यांच्या जमावाने घेराव घालून हल्ला केला. जमावाने ईडी अधिकाऱ्यांच्या तसेच केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोड केली.
#WATCH उत्तर 24 परगना: पश्चिम बंगाल के संदेशखाली में प्रवर्तन निदेशालय (ईडी) की टीम पर छापेमारी के दौरान हमला हुआ। अधिक जानकारी की प्रतीक्षा है। pic.twitter.com/nIBt5ELvOD
— ANI_HindiNews (@AHindinews) January 5, 2024
ईडी टीमवरील हल्ल्याचे हे प्रकरण उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखळी गावातील आहे. रेशन घोटाळाप्रकरणी टीएमसी नेते एसके शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी तपास यंत्रणेचे पथक येथे पोहोचले होते.
यावेळी सुमारे 200 लोकांच्या जमावाने ईडी टीमवर अचानक हल्ला केला. जमावाने ईडी अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेल्या केंद्रीय सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोड केली.
मिळालेल्या माहितीनुसार, छापा टाकण्यासाठी आलेल्या टीममध्ये ईडीच्या सहाय्यक संचालकाचाही समावेश होता. जमावाने त्यांची गाडीही फोडली. मात्र, या हल्ल्यानंतर टीएमसी नेते एसके शाहजहान यांना अटक करण्यात आली आहे.
30 टक्के रेशन खुल्या बाजारात विकले जाते
रेशन वितरण घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालमध्ये ईडीचे छापे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने यापूर्वी उघड केले होते की पश्चिम बंगालमधील लाभार्थ्यांसाठी असलेल्या सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) रेशनपैकी सुमारे 30 टक्के रेशन खुल्या बाजारात पाठवले गेले होते. रेशनच्या कथित चोरीनंतर सापडलेले पैसे गिरणी मालक आणि पीडीएस वितरकांमध्ये वाटण्यात आल्याचे तपास यंत्रणेने म्हटले होते.
शेतकऱ्यांनी बनावट बँक खाती उघडली
राईस मिल मालकांनी काही सहकारी संस्थांसह काही लोकांच्या संगनमताने शेतकऱ्यांची बनावट बँक खाती उघडून धान उत्पादकांना दिलेला एमएसपी खिशात घातला. मुख्य संशयितांपैकी एकाने कबूल केले की तांदूळ गिरणी मालकांनी प्रति क्विंटल सुमारे 200 रुपये कमावले होते.
ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावरही छापा टाकला
यापूर्वी रेशन घोटाळ्याप्रकरणी बंगालच्या मंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या घरावरही ईडीने छापे टाकले होते. वनमंत्री होण्यापूर्वी ज्योतिप्रिया मलिक यांनी अन्नमंत्रीपदाची जबाबदारीही सांभाळली होती. यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने या कथित घोटाळ्यात तांदूळ मिल मालक बाकीबुर रहमान याला अटक केली होती.
2004 मध्ये राईस मिल मालक म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या रहमानने पुढील दोन वर्षांत आणखी तीन कंपन्या स्थापन केल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रहमानने कथितरित्या शेल कंपन्यांची मालिका उघडली आणि पैसे काढले.
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्र्यांना अटक
याआधीही टीएमसी नेत्यांवर ईडीचे छापे पडले आहेत. तपास यंत्रणेने पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांची भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात चौकशी केली आहे. बंगालचे माजी शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना 2022 मध्ये शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765