AccidentNewsUpdate : कार आणि ट्रकच्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार ..
नाशिक: मनमाड-येवला राज्य महामार्गावर स्विफ्ट कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून कारमधील सर्व पाच जण जागीच ठार झाले असल्याचे वृत्त आहे. अंकाईजवळील रेल्वे उड्डाणपुलावर हा अपघात घडला घडला. अपघातातील सर्व प्रवासी हे नाशिकमधील गंगापूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.
रोहित धनवटे, श्रेयस धनवटे, ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे असून हे पाचही तरुण नाशिकचे रहिवाशी आहेत. मनमाड जवळच्या म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रम उरकून येवला मार्गे नाशिककडे परतत असताना हा भीषण अपघात झाला. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. या अपघाताच्या वेळी सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्यास अडथळा येत होता. त्यामुळे वाहतूक दुतर्फा ठप्प झाली होती.
ही धडक इतकी भीषण होती या अपघतात स्वीफ्ट कारचा चुराडा झाला आहे. स्थानिकांनी अपघात ग्रस्तांना कार मधून बाहेर काढले. मात्र, अपघात ऐवढा भीषण होता ही कारमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. अपघातातील सर्व जण नाशिक येथील तरुण आहेत. पोलिस मृत तरुणांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत.