Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaPoliticalUpdate : झारखंड मध्ये काय चाललंय ? सरकार वाचविण्यासाठी हेमंत सोरेन यांचे युद्ध सुरु …

Spread the love

रांची : झारखंड मध्ये  उभे राहिलेले राजकीय संकट थोपविण्यासाठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन शर्थीचे प्रयत्न करताना दिसत  आहेत. आज त्यांच्या  निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक झाली. हि  बैठक संपल्यानंतर सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना घेऊन जाणाऱ्या तीन बस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून अज्ञात स्थळी निघताना दिसल्या. झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) च्या आमदारांसह सुरक्षा कर्मचारीही बसमध्ये उपस्थित होते. घोडेबाजाराच्या भीतीने आमदारांना सुरक्षित स्थळी पाठवले जात असल्याचे बोलले जात आहे. आमदारांना कुठे पाठवले जात आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.


गरज पडल्यास सत्ताधारी आघाडीच्या आमदारांना पश्चिम बंगाल किंवा छत्तीसगड सारख्या “मैत्रीपूर्ण राज्यांमध्ये” हलवण्याची तयारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. भाजपकडून अंडरणाचा घोडेबाजार होऊ नये या भीतीपोटी हे केले जात आहे. काँग्रेसच्या एका नेत्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले होते की, “आमच्या युतीच्या आमदारांना छत्तीसगड किंवा पश्चिम बंगालमध्ये पाठवण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. दोन्हीही बिगर-भाजप सरकारे चालवतात. तीन लक्झरी बस आमदारांना रस्त्याने घेऊन जातील.” यासाठी रांचीला पोहोचलो आहोत. काही एस्कॉर्ट वाहने देखील सोबत असतील.”

झारखंडची रणनीती ठरविण्यासाठी सत्ताधारी आघाडीच्या आमदारांची तिसरी फेरी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पार पडली. सर्व सत्ताधारी आमदार आपापल्या सामानासह बैठकीला उपस्थित होते.

भाजप सत्तारूढ आघाडीच्या मागावर …

दरम्यान याप्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबे यांचे ट्विटही समोर आले आहे. ज्यात त्यांनी लिहिले की, ‘झारखंड मुक्ती मोर्चाच्या सूत्रांनुसार, काही आमदार पहाटे 2 वाजता छत्तीसगडमध्ये पोहोचले. बहुतेक आमदार जाण्यास कचरत आहेत आणि जेएमएमचे ज्येष्ठ नेते बसंत सोरेन यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. आमदारांसाठीच्या काही बसेस रांचीत उभ्या आहेत.

खरं तर, झारखंडचे राज्यपाल रमेश बैस शनिवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अपात्र ठरवणारा आदेश निवडणूक आयोगाकडे (ECI) पाठवू शकतात. राजभवनच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या अहवालांदरम्यान, सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) – काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) आघाडी पुढील रणनीती बनवत आहे.

घटनात्मक संस्थांचा गैरवापर केला जात आहे…

दुसरीकडे, सोरेन यांनी शुक्रवारी ट्विट केले होते की, “आमचे विरोधक राजकीयदृष्ट्या आमच्याशी स्पर्धा करू शकत नसल्यामुळे ते घटनात्मक संस्थांचा गैरवापर करत आहेत. पण आम्हाला काळजी नाही… त्यांनीच आम्हाला खुर्ची दिली आहे. तुम्ही काहीही करू शकता, माझ्या लोकांसाठी माझे काम कधीही थांबू शकत नाही.

81 सदस्यीय विधानसभेत सत्ताधारी आघाडीचे 49 आमदार आहेत. सर्वात मोठा पक्ष जेएमएमकडे 30 आमदार, काँग्रेसचे 18 आमदार आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे (आरजेडी) एक आमदार आहे. प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे २६ आमदार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!