AurangabadCrimeUpdate : भुरट्या चोरांकडून ५ दुचाकी जप्त तर दुसऱ्या प्रकरणात पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाले ६ तोळे सोने !!
औरंगाबाद – शहरपरिसरातून १लाख ६० हजारांच्या ५ मोटरसायकल लंपास करणार्या दोन भुरट्या चोरांना मुद्देमालासहित बेगमपुरा पोलिसांनी अटक केले. मो.हुसेन मो.गौस(२२) रा संजयनगर बायजीपुरा , आरिफ सय्यद अहमद सय्यद (२०) रा.बुढीलेन अशी अटक आरोपींचीनावे आहेत.वरील चोरट्यांनी अटकेनंतर पोलिसांना ५दुचाकी वापस दिल्या आहेत.अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
सहा तोळे सोने जवाहरनगर पोलिसांनी मिळवून दिले.
पोलिसांच्या तत्परतेमुळे मिळाले ६ तोळे सोने
फोनवर बोलण्याच्या नादात पार्किंगमधे असलेल्या बाकावर विसरलेले ६ तोळे सोने जवाहरनगर पोलिसांच्या तत्परतेने परत मिळवून देण्यात आले. खिवंसरा पार्क उल्कानगरी मधे पुण्याच्या शिला जाधव बहीणीच्या घरीआल्या होत्या, अज दु.दीड वा. बहीणीचे सोन्याचे सहा तोळे वजनाचे दागिने बाहेर नेतांना फोनआल्यामुळे बोलता बोलता बाकावर विसरले.पण बाहेर गेल्यानंतर दहा मि.जाधव यांच्या लक्षात आले की त्या दागिने पार्किंगमधे विसरल्या.त्यांनी दागिने हरवल्याची तक्रार जवाहरनगर पोलिसांना दिली.पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांनी पीएसआय संतोष पाटील यांना घटनास्थळी पाठवले पीएसआय राऊत यांनी घटनास्थळावरील सी.सी.टिव्ही फुटेज तपासले .त्यामधे बायजीपुरा परिसरातील एक रिक्षा संशयित रित्या आढळली.त्वरीत त्या रिक्षाचालकाचा पाठलाग करुन दागिने हस्तगत केले.या प्रकरणी वृत्त हाती येई पर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता,जवाहरनगर पोलिसांनी शीला जाधव यांचे दागिने परत केले.