Aurangabad Crime : भिक मागण्यावरून किन्नर आपसात भिडले, तीन जखमी एक गंभीर
रेल्वेस्थानकावर भिक मागण्याचा कारणावरून किन्नराचे दोन गट आपसात भिडले. लाठ्या-काठ्या झालेल्या मारहाणीत तीन किन्नर जखमी झाले असून एका प्रकृती गंभीर आहे. ही घटना आज शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास रेल्वेस्थानकाजवळील मैदानात घडली. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मरा’वाड्यातील किन्नराचे औरंगाबाद रेल्वेस्थानक हे भिक मागण्याचे केंद्र बिंदू आहे. या ‘िकाणी किन्नर जमा होतात. भिक मागण्यावरून त्यांच्यात अनेकदा वादही झालेले आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भिक मागण्याच्या कारणावरून किन्नराचे दोन गटलाठ्या-काठ्या आणि धारदार शस्त्रे हाती घेऊन समोरासमोर भिडले. यात पडेगावातील सुहाना सिमा शेख (२५), मिसरावाडीतील झोया सुहाना शेख (२२) आणि निकीता सुहाना शेख (२१) हे तिघे जखमी झाले. यात सुहाना शेख हिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी सलमा, तम्मो आणि अक्षराविरुद्ध वेदांतनगर पोलीस ‘ाण्यात नोंद करण्यात आली आहे.