Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AgnipathNewsUpdate : अग्निपथच्या विरोधात भारत बंद , 181 मेल एक्स्प्रेस आणि 348 पॅसेंजर गाड्या रद्द

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमध्ये तरुणांनी केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला विरोध करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी हिंसक निदर्शनेही झाली आहेत. या निदर्शनांमुळे बिहारमधील सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने सोमवारी बिहारमधील सुमारे 350 गाड्या न चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

यासोबतच सोमवारी 20 जिल्ह्यांतील इंटरनेट सेवाही बंद राहणार आहे. दरम्यान, या योजनेला विरोध होत असतानाच आता अनेक संघटनांनी आज म्हणजेच २० जून रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. भारत बंदच्या घोषणेनंतर राज्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी दिल्ली-गुरुग्राम द्रुतगती मार्गावर भारत बंदमुळे मोठ्या प्रमाणात रस्ता जाम झाला होता. यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Advertisements

181 मेल एक्स्प्रेस आणि 348 पॅसेंजर गाड्या रद्द

भारत बंदमुळे 181 मेल एक्सप्रेस आणि 348 पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, 04 मेल एक्सप्रेस आणि सहा पॅसेंजर गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. भारत बंदमुळे बाधित झालेल्या एकूण गाड्यांची संख्या ५३९ वर पोहोचली आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!