Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवर मोहन भागवत यांचे अप्रत्यक्ष भाष्य

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर आर एस एस चे प्रमुख मोहन भागवत यांनी अप्रत्यक्षरीत्या भाष्य केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपा व शिवसेना या दोन्ही मित्र पक्षात मुख्यमंत्रीपद आणि सत्तेतील समान वाटा या मुद्यांवरून एकमत न झाल्याने, जनतेने कौल दिल्यानंतरही राज्यात महायुतीला सत्तास्थापन करता आलेली नाही. परिणामी सध्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू आहे.

Advertisements

या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले कि ,  ”आपसात भांडल्याने दोघांचंही नुकसान होतं, हे माहिती असुनही काहीजण भांडतात”  नागपूर येथील एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

Advertisements
Advertisements

“स्वार्थ अत्यंत वाईट गोष्ट आहे, हे सर्वांना माहित आहे. मात्र, आपल्या स्वार्थाला खूप कमीजण सोडतात. देशांचे उदाहरण घ्या किंवा व्यक्तींचे. माणसाला हे देखील माहिती आहे की निसर्गाला नष्ट केल्याने आपलाही विनाश होणार आहे. मात्र, निसर्गाला नष्ट करण्याचे कार्य अद्यापही थांबलेले नाही. आपसात भांडण केल्याने दोघांचेही नुकसान होते. तरीदेखील आपसातील भांडणं अद्यापही बंद झालेली नाहीत,” असं देखील सरसंघचालक मोहन भागवत यावेळी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!