Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

या देशात जिवाला जीव देणारी नाही जीव घेणारी माणसे तयार होत आहेत… – उद्धव ठाकरे

Spread the love

उद्धव ठाकरे सध्या बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारी चिखली येथे जनसंवाद बैठकीत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जीव देण्याऐवजी जीव घेणार अशी माणसे तयार केली जात आहेत, अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त करून महायुती सरकारवर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, या देशात जिवाला जीव देणारी माणसे आता राहिलेली नाहीत, तर जीव घेणारी माणसं तयार होत आहेत का? अशी भीती वाटू लागली आहे. असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले की, हल्ली मी बघत आहे ही अशी विराट गर्दी व्हावी यासाठी लोकांना बिर्याणी मागवावी लागते. मग लोकं बिर्याणीवर ताव मारतात आणि निघून जातात. पण शिवसेनेला तसे करावे लागत नाही. आम्हाला बिर्याणी वाटायची गरज लागत नाहीत.

मी तुमच्या प्रेमाचा भुकेला आहे. पण आता प्रेम करणारी माणसे मिळत नाही. शिवसेनेने ज्यांना मोठे केले ती माणसे निघून गेली. पण ज्यांनी त्यांना मोठे केले त्या माणसांना बघायला मी याठिकाणी आलो आहे.

लोकांचे प्रेमाचे जे ऐश्वर्य आहे ते त्या गद्दारांच्या नशीबात नाही. शिवसेनेचे धनुष्यबाण चोरले, पक्षाचे नाव चोरले, पण आता ते त्यांच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का पुसू शकत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर केली आहे.

अन्नातून विषबाधेच्या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, बुलढाणा, हिंगोली, नंदुरबार येथील अन्नविषबाधेची घटना दुर्दैवी आहे. मुद्दाम केले का घातपात होता, अशी चर्चा आहे. साधारणत: वर्षभरापूर्वी श्रीसदस्यांचे बळी गेले.

कंत्राटदाराला करोडो रुपये दिले. करोडो रुपये देऊन कंत्राटदाराचे पोट भरले, पण करोडो रुपये खाल्ल्यानंतर कंत्राटदाराने उन्हातान्ह्यात जमलेल्या लोकांसाठी काहीच सोय केली नाही. याचा तपास अ्दायप सरकारने केलेला नाही.

आता विषबाधा झाल्यावर उपचारासाठी डॉक्टर नव्हते, हे आपले सरकार? बुलढाण्यात दुष्काळाची परिस्थिती आहे, पण सरकार काय करते आहे? असे सवाल करत काही दिवसांपूर्वी अवकाळीचा पाऊस पडला, आपत्ती आली.

पण आपले सरकार असतानाही आपत्ती आली. त्यावेळेला लोकांना मदत मिळाली. दोन लाखांपर्यंतची कर्ज माफ करायची योजना राबवली होती. त्यामुळे मैदानात येऊन लोकांमध्ये जाऊन विचारायला पाहिजे कुणाचे सरकार आवडले. होऊन जाऊ दे सामना, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!