Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी पुन्हा बेमुदत उपोषण… जरांगे पाटलांनी जाहीर केला मुंबईला येण्याचा मार्ग
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी २६ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क मैदानावर बेमुदत उपोषण करणार असल्याचे मनोज जरंगे यांनी सांगितले संगितले आहे. 20 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवली सरती गावातून मोर्चा सुरू होणार असून ते काही प्रवास पायी करणार असून काही प्रवास वाहनातून करणार असून २६ जानेवारीपर्यंत मुंबई गाठण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे स्पष्ट केले.
मोर्चाचा मार्ग आणि मुक्कामाची ठिकाणं
- 20 जाने सकाळी 9 वाजता अंतरवलीमधून निघणार
- 20 जानेवारी पहिला मुक्काम- शिरूर(बीड) तालुक्यातील मातोरी डोंगर पट्ट्यात
- 21 जानेवारी दुसरा मुक्काम – करंजी घाट, बारा बाभळी-(अ. नगर)
- 22 जानेवारी तिसरा मुक्काम-रांजणगाव-(पुणे जिल्हा)
- 23 जानेवारी चौथा मुक्काम – खराडी बाय पास,पुणे
- 24 जानेवारी पाचवा मुक्काम- लोणावळा
- 25 जानेवारी 6 वा मुक्काम – वाशी, नवी मुंबई
- 26 जानेवारी 7 मुक्काम आझाद मैदान आंदोलन स्थळी पोहोचणार, आमरण उपोषणालाही सुरुवात
सकाळी 9 वाजल्या पासून 12 पर्यंत चालत जाऊयात. आपण देवाकडे जात नाही. आपल्या मागण्यासाठी सरकारकडे जातोय. ज्याला जमेल त्याने चालायचे. नाहीतर बिनधास्त गाडीमध्ये बासायचे. दुपारी 12 पर्यंतच सर्वांनी चालायचे आहे, अशा सूचना मनोज जरांगे यांनी आंदोलकांना दिल्या आहेत.
26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात
शिवाजी पार्क आणि आझाद मैदान आम्हाला दोन्ही मैदान लागतील. 26 जानेवारीपासून आमरण उपोषणाला सुरुवात होईल. प्रत्येक जिल्ह्यातील बांधवांनी त्यांच्या हद्दीपर्यंत वाटं लावायला यायचे आहे.
पुण्यामध्ये मराठा समाजाच्या करोडोच्या आकड्यात असणार आहेत. सर्व प्रकारची वाहने मुंबईकडे जाणार आहे. मुंबईला जाणारे प्रत्येकजण आपल्या वस्तू सोबत घेणार असून. झोपताना आपल्या वाहनाजवळ झोपायचे आहे, असेही मनोज जरांगे यांनी यावेळी मराठा बांधवांना सांगितले आहे.
जरांगेंच्या आंदोलकांना सूचना
मुंबई जाताना कुणीही व्यसन करायचे नाही. मुंबई जाताना प्रत्येकने स्वयंसेवक म्हणून काम करायचे आहे. ज्यांच्या कडे पाण्याचे टँकर असेल, जनरेटर असेल घेऊन या. आपणच आपल्या लोकांची सेवा करायची आहे. आता लेकरासाठी मुंबईला जायचे आहे, असे आवाहन जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलकांना केले आहे.
आपल्या खाण्या पिण्याच्या वस्तू सोबत घ्यायच्या आहेत. मी एकटा निघणार आहे, मग सोबत एक लाख असो की एक कोटी… रोज पायी बारा वाजे पर्यंत चालायचे आहे. नंतर मुक्कामी पोहचायचं आहे. 90 ते 100 किलोमीटरवरच्या आत मुक्काम असणार आहे. सरकारला आता वेळ द्यायचा नाही, असेही जरांगे म्हणाले.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765