IndiaNewsUpdate : आंध्र प्रदेशात दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर, 13 जणांचा मृत्यू , 50 प्रवासी जखमी
हैद्राबाद : आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी (२९ ऑक्टोबर) दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर झाली. या रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 प्रवासी जखमी झाले आहेत. स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मृतांना भरपाई जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
०८५३२ विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर आणि ०८५०४ विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल अशी रेल्वे अपघातात सहभागी झालेल्या गाड्यांची नावे असल्याचे रेल्वेने सांगितले आहे. या धडकेमुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलावे लागले. ज्या मार्गावर हा रेल्वे अपघात झाला तो हावडा-चेन्नई मार्ग म्हणून ओळखला जातो. सध्या रेल्वे ट्रॅक स्वच्छ करण्याचे काम सुरू आहे.
#WATCH | Drone visuals of the train collision in Vizianagaram, Andhra Pradesh. Rescue operations underway pic.twitter.com/ou24l03HP1
— ANI (@ANI) October 30, 2023
महत्वाच्या अपडेट्…
विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर स्पेशल ट्रेनने विझियानगरम जिल्ह्यातील कंटकपल्ले येथे संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मागून येणाऱ्या विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर ट्रेनला धडक दिल्याचे रेल्वेने म्हटले आहे. त्यामुळे त्याचे चार डबे रुळावरून घसरले. अपघातामागील मानवी चूक असल्याचे सांगण्यात येत आहे.
विजियानगरम जिल्ह्याचे एसपी म्हणाले की, या रेल्वे अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 50 जण जखमी झाले आहेत.
भारतीय रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा रेल्वे अपघात अलमांडा आणि कंटकपल्ली रेल्वे स्थानकादरम्यान घडला आहे. अपघातामुळे विजेच्या तारा उखडल्या, त्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात बुडाला. त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात गुंतलेल्या लोकांनाही अडचणींचा सामना करावा लागला आहे.
#WATCH | Andhra Pradesh Train accident: Biswajit Sahu, CPRO, East Coast Railway, says "So far, 11 people have died and 50 others are injured. We are presently focusing on the track restoration work. The rescue operation is over now…We have arranged buses and trains for the… pic.twitter.com/cKrXPMRiT5
— ANI (@ANI) October 30, 2023
विझियानगरम जिल्ह्यात झालेल्या या रेल्वे अपघातानंतर रेल्वेने १३ गाड्या रद्द, वळवल्या किंवा बंद केल्या आहेत. रेल्वेने सांगितले की, अपघातामुळे ट्रॅक ब्लॉक झाला आहे, ज्याच्या दुरुस्तीचे काम अजूनही सुरू आहे, त्यामुळे ट्रेन येथून जाऊ शकत नाही.
रेल्वे अपघातानंतर विजयनगरम जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार केला आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक ९४९३५८९१५७ आहे. याशिवाय प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी 8978080006 हा हेल्पलाइन क्रमांकही जारी करण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सीएम रेड्डी म्हणाले की त्यांनी जिल्हा अधिकार्यांना तात्काळ मदत उपाययोजना अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. विशाखापट्टणम आणि अनकापल्ले जिल्ह्यांमधून रुग्णवाहिका सेवेत आणल्या जातील.
रेल्वे अपघातातील मृतांना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री रेड्डी यांनीही पीडितांना भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. तर इतर राज्यात मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत.
The Prime Minister has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from the PMNRF for the next of kin of each deceased due to the train derailment between Alamanda and Kantakapalle section. The injured would be given Rs. 50,000. https://t.co/K9c2cRsePG
— PMO India (@PMOIndia) October 29, 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याची घोषणाही त्यांनी केली.
पंतप्रधान मोदींनी रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना PMNRF कडून 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली. जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले.
मदत आणि बचाव कार्यात गुंतलेले कर्मचारी ट्रेनच्या बोगीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढताना दिसत होते. रात्रभर मदतकार्य सुरूच होते. आतापर्यंत रेल्वेला ट्रॅक पूर्णपणे साफ करता आलेला नाही. अशा परिस्थितीत बचावकार्य सुरूच राहणार आहे.