Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

तब्बल २३ वर्षांनंतर सुरत पोलिसांनी फरार हत्याऱ्याला ठोठावल्या बेड्या

Spread the love

२३ वर्षांनंतर सुरत पोलिसांनी एका खुनाच्या गुन्ह्यातील फरार असल्या गुन्हेगाराला उत्तर प्रदेशातील मथुरा येथून अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून गुजरातच्या वॉन्टेड गुन्हेगार साधूच्या वेशात मथुरेतील एका आश्रममध्ये  राहत होता. त्याला मथुरेतील आश्रमातून पकडण्यासाठी सुरत पोलिसांना स्वतः भिक्षू आणि पुजारी असा वेश धारण करून काही दिवसात गुन्हेगाराला अटक करण्यात आली.

सध्या सुरत पोलीस वॉन्टेड गुन्हेगारांची यादी तयार करत आहेत आणि त्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवत आहेत. विशेषत: पोलिसांच्या यादीत अनेक दिवसांपासून वॉन्टेड असलेल्यांचा शोध सुरू आहे. असे वॉन्टेड गुन्हेगार ज्यांच्यावर पोलिसांनी बक्षिसेही जाहीर केली आहेत.  गुजरातच्या वॉन्टेड गुन्हेगाराचे नाव पदम उर्फ राकेश पांडा आहे. पोलिसांनी पदम उर्फ राकेश पांडा याच्यावर ४५ हजारांचे बक्षीसही ठेवले होते.

पदम उर्फ राकेश पांडा याने २००१ साली सुरत येथील विजय सचिदास नावाच्या व्यक्तीची हत्या केली होती. तेही फक्त तो त्याच्या कथित मैत्रिणीच्या घरी जायचा. पदम उर्फ राकेश पांडा पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून मथुरेला पोहोचला होता आणि तिथे त्याने साधूचा वेश धारण केला होता. त्यानंतर मथुरेतील नंद गावात असलेल्या कुंजकुटी आश्रमात संन्यासी म्हणून तो राहू लागला . त्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने केस आणि दाढीही वाढवली. मानवी पाळत आणि इतर संसाधनांच्या आधारे, मूळ ओडिशातील गंजम जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या गुन्हेगाराला पकडण्यासाठी सूरत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या प्रतिबंधक पथकाने मथुरा येथील कुंजकुटी आश्रमात पोहोचले. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी स्वत: भिक्षू आणि पुरोहितांचा वेश धारण केला. त्यानंतर दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

सुरतचे पोलीस आयुक्त अजय कुमार तोमर म्हणाले की, सूरत शहर हे औद्योगिक शहर आहे. देशातील इतर राज्यातील लोक येथे रोजगारासाठी येतात. ज्यामध्ये काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही सामील आहेत. पदम उर्फ राकेश पांडा हा मूळचा ओरिसातील गंजाम जिल्ह्यातील रहिवासी असून तो गुजरात येथील सुरतमध्ये भजिया बनवायचा.

२००१ मध्ये आरोपी पदम उर्फ राकेश पांडा हा सुरत शहरातील उधना परिसरातील शांतीनगर सोसायटीत भाड्याने राहत होता. त्याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. विजय शांतीदास नावाचा व्यक्तीही अनेकदा त्या महिलेच्या घरी जात असे. आरोपी पदम उर्फ राकेश पांडा याला हे सर्व आवडले नाही. त्यामुळेच त्याने इतर मित्रांसोबत ३ सप्टेंबर २००१ रोजी विजयचे अपहरण केले. त्यानंतर उधना खाडीकिनारी नेऊन गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह नाल्यात फेकून सर्व आरोपी फरार झाले.

 


BuldanaBusAccidentUpdate : आरटीओ ने दिला आपला प्राथमिक अहवाल , शिंदे -फडणवीस यांची घटना स्थळाला आणि जखमींना भेट , विरोधकांची टीका …

 

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!