#CoronaVirusEffect : मोठी बातमी : औरंगाबाद महापालिकेची मुदत आज संपत असल्याने निवडणूक आयोगाने घेतला हा निर्णय….

राज्यातील कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक केंव्हा होईल हे नक्की नसल्याने आणि औरंगाबाद महानगपालिकेची मुदत आज म्हणजेच, २८ एप्रिल रोजी संपत असल्यानं औरंगाबाद महापालिकेबरोबरच नवी मुंबई महानगपालिकेची मुदत ७ मे रोजी तर वसई-विरार महानगरपालिकेची मुदत २८ जून रोजी संपणार आहे. कोरोनामुळे या तीनही महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून त्या लवकर होणे शक्य नसल्याने या तीनही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करावा असं पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले असल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्त वहिनीने दिले आहे
महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यातील सर्वच निवडणुका निवडणूक आयोगाने अनिश्चित काळापर्यंत स्थगित केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने औरंगाबाद, नवी मुंबई आणि वसई विरार महापालिकेचा समावेश आहे. या तिनही महानगरपालिकांच्या निवडणुका कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. अशातच आता या तिनही मोठ्या महानगरपालिकांवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. याशिवाय काल नांदेड महापालिकेच्या महापौर , उपमहापौर पदाची निवडणुकाही काल मंत्रिमंडळाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील तीन महापालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या असून आता या महापालिकांवर प्रशासकाची नियुक्त करण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या तिनही महानगरपालिकांची मुदत संपत आली आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता येथे निवडणुका घेणं अशक्य असल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे या महानगपालिकांवर प्रशासकीय आयुक्त नेमावा असं पत्र राज्य निवडणुक आयोगाने राज्य सरकारला दिलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने प्रशासकीय आयुक्तांच्या नेमणुकीसाठी हालचाली सुरू केल्या असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.