Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : काय आहे प्रकरण ? तब्ब्ल ३१ वर्षानंतर १२ जनपथवरील रामविलास पासवान यांचा पत्ता इतिहास जमा…

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनामुळे तब्बल ३१ वर्षाच्या प्रदीर्घ काळापासून पासवान यांचे निवासस्थान म्हणून ओळखले जाणारे १२ जनपथ हे त्यांचे निवासस्थान सरकारने खाली करून घेतले. देशातील ज्येष्ठ नेते म्हणून या निवासस्थानी त्यांचे स्मारक बनवावे अशी मागणी त्यांचे पुत्र खा. चिराग पासवान यांनी केली होती परंतु हि मागणी अमान्य करीत सरकारने पोलीस बळाचा वापर करत आज हे निवासस्थान पासवान कुटुंबियांच्या ताब्यातून खाली करून घेतले. विशेष म्हणजे चिराग पस्वान यांनी या निवासस्थानाच्या परिसरात रामविलास पासवान यांचा पुतळाही बसविला होता. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानापासून दोन बंगले सोडून हा बांगला आहे. 

सरकारच्या निवेदनानुसार खा. चिराग पासवान यांना निवासस्थान खाली करण्याच्या नोटीस देऊनही त्यांनी या नोटिसांना कुठलेही उत्तर दिले नाही त्यामुळे केंद्र सरकारने अखेर त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकारी पथक पाठवून घर ताब्यात घेण्याची कारवाई  केल्यानंतर त्यांनी अखेर  हे निवासस्थान सोडण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्र्यांना नवी दिल्लीत सरकारी निवासस्थान दिले जाते आणि मंत्रीपद सोडल्यानंतर किंवा  पदावर असताना मृत्यू झाल्यानंतरही त्यांना या निवासस्थानाचा त्याग करावा लागतो. मात्र रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतरही लोकसभा खासदार चिराग पासवान यांनी १२ जनपथ येथील सरकारी निवासस्थान न सोडल्याने त्यांना नोटीस पाठवण्यात आली होती. मात्र या नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने मालमत्ता संचालकांचे पथक पासवान यांच्या निवासस्थानी पाठवले. या कारवाईनंतर चिराग पासवान यांना हे निवासस्थान सोडावे लागले.

Advertisements

बंगल्यांचे स्मारकात रूपांतर करण्यावर सरकारची बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील माजी अन्न मंत्री यांचे हृदय शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी ऑक्टोबर 2020 मध्ये निधन झाले. हे घर दिल्लीतील लोक जनशक्ती पक्षाचा अधिकृत पत्ता आहे आणि पक्षाच्या सर्व अधिकृत कार्यक्रम आणि संघटनात्मक बैठकांसाठी वापरला जात असे. त्यांच्या निधनानंतर पक्षाने लॉनमध्ये त्यांचा पुतळा बसवून बेकायदेशीरपणे बंगल्याचे स्मारकात रूपांतर केले होते. मात्र  2000 मध्ये केंद्राने लुटियन्सच्या बंगल्यांचे स्मारकात रूपांतर करण्यावर सरकारने बंदी घातली होती. दरम्यान  आज, केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत संपदा संचालनालयाने, बेदखल आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहराच्या मध्यभागी असलेल्या बंगल्यावर आपली टीम पाठवून हा बंगला रिकामा करण्याची कारवाई केली.

Advertisements
Advertisements

या पूर्वी झालेले वाद

रामविलास पासवान यांच्या निधनानंतर, त्यांनी स्थापन केलेला पक्षही आता दुभंगला आहे, कारण त्यांचा मुलगा आणि भाऊ पशुपती कुमार पारस यांच्यात त्यांचा वारसा आणि पक्षाच्या नेतृत्वावरून मतभेद निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे मंत्री आणि त्यांच्या कुटुंबीयांचे ल्युटियन्सच्या बंगल्यात राहणे सामान्य आहे. 2014 मध्ये, माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांच्याशी निवासाच्याच विषयावरून सरकारशी  दीर्घकाळ वाद झाला होता, शेवटी त्यांनाही  त्यांचा 12 तुघलक रोड बंगला रिकामा करावा लागला होता. त्याच वेळी, 2020 मध्ये, एसपीजी सुरक्षा काढून घेतल्यानंतर, सरकारने प्रियंका गांधी वाड्रा यांना नोटीस पाठवून त्यांना बंगला रिकामा करण्यास सांगितले की त्या या सुविधेसाठी पात्र नाहीत. त्यानंतर या प्रकरणाने राजकीय लढाईचे रूप धारण केले आणि काँग्रेसने सरकारवर द्वेष आणि सूडबुद्धीचा आरोप केला होता. काँग्रेसच्या काळात लोकसभा हरल्यामुळे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही तत्कालीन सरकाने बाळाचा वापर करून आठवले यांचे घर रिकामे करून घेतले होते हे उल्लेखनीय.

चिराग पासवान ही मागणी करत होते

यासंदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की, १२ जनपथ बंगला केंद्रीय मंत्र्यांसाठी राखून ठेवण्यात आला असून सरकारी निवासस्थानातील रहिवाशांना तो रिकामा करण्यास सांगण्यात आले आहे. रामविलास पासवान यांचे ऑक्टोबर 2020 मध्ये निधन झाले. सहा महिन्यांत तो रिकामा करायचा होता, पण चिरागने बंगला रिकामा केला नाही. या बंगल्यात ते कुटुंबासह राहत होते. यासोबतच त्यासाठी स्मारकाची जागा बनवण्याची मागणी केली जात होती. कारण या बंगल्यात रामविलास तब्बल ३१ वर्षांपासून राहत होते.  पाच-सहा वेळा खासदार राहिलेल्या नेत्यांसाठी हा बंगला आहे. त्यामुळे नियमानुसार  चिराग दुसऱ्यांदा खासदार झाल्यामुळे त्यांना या बंगल्यात राहता आले नाही. तसेच हा बंगला सध्याच्या रेल्वेमंत्र्यांना देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे लक्षात घेण्यासारखे आहे की, खासदार म्हणून चिराग पासवान यांना यापूर्वीच नॉर्थ एव्हेन्यूमध्ये घर देण्यात आले आहे.

केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना दिला ‘या’ बंगल्याचा ताबा

लोक जनशक्ती पक्षाचा (एलजेपी) अधिकृत पत्ता असलेले घर आता माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान आणि त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांच्यात फुटले आहे. पक्ष संघटनात्मक बैठका आणि इतर संबंधित कार्यक्रम आयोजित करण्यासाठी त्याचा नियमित वापर केला जात असे. लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचा दिल्लीतील १२ जनपथ येथील सरकारी बंगला आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्ण यांना देण्यात आला आहे. त्यामुळे हा बंगला शहरी विकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाच्या अंतर्गत संपदा संचालनालयाने 14 जुलै 2021 रोजी चिराग पासवान यांना हा बंगला रिकामा करण्याची नोटीस पाठवली होती. तर लोकसभा खासदार चिराग हे आईसोबत राहत होते, त्यांनी वडिलांच्या पुण्यतिथीपर्यंत या बंगल्यात राहण्याची परवानगी मागितली होती.

पशुपती कुमार पारस यांचा बंगला घेण्यास नकार

हा बंगला लुटियन्सच्या सरकारी बंगल्यातील सर्वात मोठ्या निवासस्थानांपैकी एक आहे, जो लोक जनशक्ती पक्षाचा अधिकृत पत्ता देखील आहे. यापूर्वी 12 जनपथ हा सरकारी बंगला केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस, रामविलास पासवान यांचे भाऊ आणि चिराग पासवान यांचे काका यांना देण्यात येणार होता,मात्र  त्यांनी तो घेण्यास नकार दिला, कारण यामुळे बिहारच्या राजकारणात चुकीचा संदेश जाईल. बिहारचे दलित नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे 8 ऑक्टोबर 2020 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या राजकीय प्रवासात ते नेहमीच केंद्राच्या राजकारणात राहिले. यामुळेच त्यांनी देशाच्या पाच पंतप्रधानांसोबत काम केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!