Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronamaharashtraUpdate : मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात , राज्याने ३ लाखाचा टप्पा ओलांडला, एक लाखाहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण

Spread the love

राज्यातील  कोरोना बाधितांच्या एकूण संख्येने आज ३ लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यात एकूण रुग्णसंख्या ३ लाख ९३७ इतकी झाली असून गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आणखी १४४ जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात आतापर्यंत ११ हजार ५९६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात सध्या १ लाख २३ हजार ३७७ रुग्णांवर (अॅक्टिव्ह रुग्ण) प्रत्यक्षात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान राज्यात आज दिवसभरात करोना संसर्गाच्या ८३४८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर ५३०६ रुग्ण आज पूर्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत १ लाख ६५ हजार ६६३ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता ५५.०५ टक्के इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रिकव्हरी रेट ५५ टक्क्यांच्या आसपास आहे. त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे ज्या मुंबई शहरात करोनाने सर्वाधिक थैमान घातले होते तिथे तब्बल ७० टक्क्यांवर रिकव्हरी रेट गेला आहे. राज्यात आज १४४ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील करोनामृत्यूंचा आकडा आता ११ हजार ५९६ इतका झाला असून राज्यातील मृत्यूदर ३.८५ टक्के इतका असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

राज्यातील अन्य आकडेवारी पाहिल्यास आतापर्यंत एकूण १५ लाख २२ हजार ५६४ इतक्या व्यक्तींच्या करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यातील ३ लाख ९३७ अहवाल पॉझिटिव्ह तर बाकी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. एकूण चाचण्यांपैकी १९.७६ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. राज्यात सध्या ७ लाख ४० हजार ८८४ इतक्या व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ४५ हजार ५५२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई पालिका हद्दीत करोनाचा प्रादुर्भाव वेगाने कमी होत असताना ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या शहरांसह औरंगाबाद, कोल्हापूर, रायगड, जालना या जिल्ह्यांत करोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. त्यामुळे या सर्वच भागांत पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे.

अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहिल्यास मुंबईच्या तुलनेत ठाणे व पुण्याचा आकडा वाढतच चालला आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या ३७ हजार २९५ इतक्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यानंतर पुणे जिल्ह्यातही अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१ हजरा ३८० इतकी आहे. तुलनेच मुंबईत ही संख्या कमी आहे. आजच्या आकडेवारीनुसार मुंबईत आता २३ हजार ९१७ करोना बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ठाणे, पुणे, मुंबई नंतर पालघर, रायगड, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्यात ३ ते ५ हजारच्या टप्प्यात अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!