Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दोन महिलांचा बळी घेणारा कारचालक अखेर गजाआड, ४८तासानंतर पोलिसांनी केली अटक

Spread the love

औरंंंगाबाद : नातीच्या लग्नासाठी आलेल्या दोन महिलांना जालना रोडवरील धूत हस्पिटलसमोर आपल्या कारखाली चिरडून त्यांचा बळी घेणा-या कारचालकास एमआयडीसी सिडको पोलिसांनी गजाआड केले. पवन जाधव (रा.संघर्षनगर, मुकुंदवाडी  परिसर) असे अटक केलेल्या  कारचालकाचे नाव आहे. सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांनी  हि माहिती दिली. अपघात करणाऱ्या वाहनाचा क्रमांक एम एच ०१ पी ए ५६९१ असा होता. ही कार मुंबई पासिंगची असल्याने, पथकाने मुंबई जाऊन आरटीओ कार्यालयातून माहिती काढली. त्यावेळी हा कार औरंगाबादमध्ये विकल्याचे स्पष्ट झाले. त्या माहितीनंतर पथकाने तपास करून शिवाजीनगरमध्ये लपून बसलेल्या वाहनचालकाला ताब्यात घेतले.

नातीच्या लग्नानिमित्ताने औरंगाबादला आलेल्या तुळसाबाई दामोदर गायकवाड (वय ७०), आशामती विष्णू गायकवाड (वय ४२), आहिल्याबाई दादाराव गायकवाड (वय ४५), तिघी राहणार देवठाणा, ता.मंठा, जि.जालना या तिघींना धुत हॉस्पीटल चौकात शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चिकलठाण्याहुन सिडकोकडे जाणा-या कारचालकाने चिरडले होते. या घटनेत तुळसाबाई गायकवाड व आशामती गायकवाड या दोघींचा मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या आहिल्याबाई गायकवाड यांच्यावर घाटी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
दरम्यान, अपघातानंतर कार क्रमांक (एमएच-०१-पीए-५६९१) घटनास्थळी सोडून कारचालकाने धुम ठोकली होती. दोन दिवस बेपत्ता असलेल्या कारचालकास एमआयडीसी सिडको पोलिसांनी तब्बल ४८ तासानंतर अटक केली.

याविषयी अधिक माहिती देताना पोलिस निरीक्षक माळाळे यांनी सांगितले की, देवठाणा (ता. मंठा) येथील गंगाधर दादाराव गायकवाड यांच्या कुटुंबातील लग्न सोहळा जालना रोडवरील म्हाडा कॉलनी परिसरातील कांचन लॉन्स येथे रविवारी आयोजित केला होता. यासाठी मंठा येथून तुळसाबाई गायकवाड, आशामती विष्णू गायकवाड, अहिल्याबाई गायकवाड या एसटी बसने शहरात आल्या होत्या. जालना रोडवरील धूत हॉस्पिटलसमोर या तिघी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास बसमधून उतरल्या. त्या रस्त्याच्या डाव्या बाजुला स्थानिक नातेवाईकांची वाट पाहत असताना, चिकलठाण्याहून सिडकोकडे भरधाव जाणाऱ्या एमएच ०१ पी ए ५६९१ क्रमांकाच्या कारच्या चालकाने त्यांना ठोकरले. या भीषण अपघातात तुळसाबाई आणि आशामती यांचा जागीच मृत्यू झाला, तर अहिल्याबाई यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस अधिकारी सुरेश जारवाल यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले होते. या पथकाकडून गेल्या दोन दिवसांपासून वाहन चालकाचा शोध सुरू होता. या पथकाने या कारचालकाचा स्थानिक पत्ता शोधून काढला. हा कारचालक भडकल गेट येथील रहिवासी असून शिवाजीनगर येथे लपून बसला होता. त्याला ताब्यात घेतल्याची माहिती माळाळे यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!