WorldIndiaNewsUpdate : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावरील वादग्रस्त टिप्पणीबाबत भारताचे अधिकृत निवेदन असे आहे ….
दोहा : भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीनकुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आखाती देशांनी आपला असंतोष व्यक्त केल्यानंतर भारताने रविवारी कतारला उद्देशून आपले अधिकृत निवेदन जरी केले आहे. या निवेदनात भारत सरकारने म्हटले आहे कि , वादग्रस्त टिप्पणी हे भारत सरकारचे नाही तर “अराजक घटकां”चे मत आहे. सरकार त्यांचे समर्थन करीत नाही. ती एका क्षुल्लक घटकांची मते असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
भारतातील एका आक्षेपार्ह ट्विटवर कतारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या वक्तव्याबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना, कतारमधील भारतीय दूतावासाचे प्रवक्ते राजदूत दीपक मित्तल यांची परराष्ट्र कार्यालयात बैठक झाली. त्यात भारतातील व्यक्तीही उपस्थित होत्या. आपल्या निवेदनात मित्तल यांनी म्हटले आहे कि , “धार्मिक व्यक्तिमत्त्वांची बदनामी करणाऱ्या काही आक्षेपार्ह ट्विटच्या संदर्भात चिंता व्यक्त करण्यात आली होती. ते वादग्रस्त ट्विट्स कोणत्याही प्रकारे भारत सरकारचे मत दर्शवत नाहीत. ही क्षुल्लक घटकांची मते आहेत.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने रविवारी आपल्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले आणि प्रेषित मोहम्मद पैगंबर तसेच अल्पसंख्याकांविरुद्ध कथित प्रक्षोभक टिप्पणी केल्याबद्दल दिल्लीचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली आहे. तसेच नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध विविध ठिकाणी पोलिसात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
भारत सरकार सर्व धर्मांना सर्वोच्च सन्मान देते …
“आमच्या सभ्यतेचा वारसा आणि विविधतेतील एकतेच्या मजबूत सांस्कृतिक परंपरेच्या अनुषंगाने, भारत सरकार सर्व धर्मांना सर्वोच्च मान देते. अपमानजनक टिप्पणी करणार्यांवर आधीच कठोर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित लोकांकडून सर्व धर्मांच्या आदरावर जोर देणारे एक निवेदन जारी केले गेले आहे, कोणत्याही धार्मिक व्यक्तिमत्त्वाच्या अपमानाचा किंवा कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा अपमान केल्याबद्दल निषेध केला गेला आहे. भारत-कतार संबंधांच्या विरोधात असलेले स्वार्थी लोक या अपमानास्पद वक्तव्याचा वापर करून लोकांना चिथावणी देत आहेत.
प्रवक्त्याने पुढे सांगितले की, “आमच्या द्विपक्षीय संबंधांची ताकद कमकुवत करण्याचा हेतू असलेल्या अशा गैरप्रकारांविरुद्ध आपण एकत्र काम केले पाहिजे.” दरम्यान, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू त्यांच्या तीन देशांच्या दौऱ्यात एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह कतारच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या सहलीत सेनेगल आणि गॅबॉनच्या भेटींचाही समावेश आहे.
कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी देशातील भारताचे राजदूत डॉ दीपक मित्तल यांना बोलावले आणि त्यांना अधिकृत नोट सुपूर्द केली. यात निराशा, संपूर्ण नापसंती आणि वादग्रस्त टिप्पण्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. दरम्यान, भारतातील सत्ताधारी पक्षाने पक्षाच्या अधिका-यांचे निलंबन आणि हकालपट्टी केल्याची घोषणा केलेल्या निवेदनाचे कतारने स्वागत केले.