MarathaReservationMaharashtra : सकल मराठा समाजाच्या नाशिक येथील बैठकीत काय ठरलं ?

आपापसातील गटबाजी विसरून एक दिलाने समजासाठी एकत्र येण्याचे सर्वाना आवाहन करताना आजच्या बैठकीला याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यासह इतरांनी यायल पाहिजे होते असे मत व्यक्त केले कोल्हापूर आणि सातारा छत्रपती एकच आहे यात काही नेते भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांना ठोकून काढा असा इशाराही त्यांनी दिला. सरकरने सार्थ संस्थेला केवळ १३० कोटी दिलेत त्याने काही होणार कमीत कमी एक हजार कोटी निधी देण्याची मागणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १८ पगड जाती एकत्र केल्यात म्हणून मी केवळ मराठा समाजाचा नाही तर मी बहुजन समाजाचा ही आहे. मराठा आणि बहुजन एकत्र आणण्यासाठी राज्यभर दौरे करत आहे असे प्रतिपादन खा. छत्रपती संभाजी राजे यांनी केले.
नाशिकमध्ये आज सकल मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती . छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनेक ठरव करण्यात आले. त्यात 2 ऑक्टोबरला राज्य भरातील सर्व आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यात विभागानुसार सर्व तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीवर राज्य शासनाने समाजाच्या हिताच्या दृष्टीने पावले उचलावीत या मागणीसाठी मराठा समाजाकडून व्यापक आंदोलन सुरु करण्यासाठी हि बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे यांच्यासह प्रत्येक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विचारवंत उपस्थित होते. राज्य सरकार समाजाला आरक्षण मिळवून देण्यात अपयशी ठरले असल्याची टीका करण्यात आली असून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने पावले उचलण्याची मागणी करण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित येवून मराठा समाजाच्या आरक्षणसांदर्भात न्यायालयात बाजू मंडण्याची मागणी करण्यात आली.
बैठकीतील काही महत्वाचे ठराव
आर्थिक निकषांवर आरक्षण नको, आरक्षणाचा निकाल लागेपर्यंत राज्यात कुठलीही भरती राज्य सरकारने करू नये, ५ ते १० तारखे दरम्यान सकल मराठा समाजाच्या वतीने विभागनुसार आंदोलन करावे, सारथी संस्थेला १ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, २ ऑक्टोबरला आमदार खासदार यांच्या घरावर धरणे आंदोलन होणार, मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीने पंतप्रधान राष्ट्पतींना पत्र लिहावे, मराठा समाजाची बाजू मांडण्यात सरकार अपयशी ठरले. आरक्षणासाठी सरकारने पावले उचलावे, अतिवृष्टीमुळे शेतकरी नुकसान झाले त्यांना मदत घ्यावी, मराठा समाजातील तरुणावर जे गुन्हे दाखल झाले. ते केंद्र आणि राज्य सरकारने मागे घ्यावे.