Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PanjabNewsUpdate : विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ८० वर , १७ जणांना अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

पंजाबमध्ये विषारी दारु प्यायल्याने आत्तापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात आणखी १७ लोकांना अटक केली आहे. तसंच १०० पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारीही केली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत अटक केलेल्यांची संख्या २५ झाली आहे. पंजाबमधील अमृतसर, बाटला आणि तरनतारन या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री विषारी दारु प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू झाला. पहिले पाच मृत्यू २९ जुलै रोजी नोंदवण्यात आले होते. आता मृत्यू झालेल्यांची संख्या ८० झाली आहे.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!