धक्कादायक : “पुन्हा आणूया आपले सरकार” हे भाजपाचे घोषवाक्य असेलले व कमळाचे चिन्ह असेलेल टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

राज्यभरात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरी आहे. एकीकडे जनतेच्या उज्वल भविष्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळी आश्वसान देत आहेत, शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची हमी दिली जात असताना दुसरीकडे एका तरूण शेतकऱ्यांने ‘पुन्हा आणुया आपले सरकार’ हे भाजपाचे घोषवाक्य असेलले व कमळाचे चिन्ह असेलेल टी-शर्ट घालून गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकसत्ता ऑनलाईनने हे वृत्त दिले आहे.
विशेष म्हणजे येथील जळगाव जामोद या मतदारसंघातील मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रचार सभेअगोदरच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. कामगार मंत्री डॉ संजय कुटे हे जळगाव जामोद येथील आमदार आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील खातखेड येथे रविवारी सकाळी ११ वाजता ही घटना समोर आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू ज्ञानदेव तलवारे (वय-३५) असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.
अद्याप याप्रकरणी प्रशासनाकडून कोणतीही बाजू मांडण्यात आलेली नाही. या अगोदर शनिवारी संध्याकाळी देखील येवला येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली होती.