Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : सीएम एकनाथ शिंदे यांनी चॅलेंज देऊनही सोबतचे पाच आमदार पराभूत !

Spread the love

मुंबई : गेल्या दाेन वर्षांत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना अनेक धक्के दिले. आता विधानसभा निवडणुकीतही शिंदे यांचे शिवसेनेचे 57 आमदार निवडून आले आहेत. लाेकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी म्हणावी तशी झाली नव्हती. त्यानंतर आता पाच महिन्यांनी शिवसेनेने पुनरागमन केले. काेपरी-पाचपाखरी मतदारसंघातून एकनाथ शिंदे स्वत: माेठ्या मताधिक्याने विजयी झाले. काेपरी-पाचपाखरी मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे नेते केदार दिघे यांच्याशी एकनाथ शिंदे यांची थेट लढत हाेती. एकनाथ शिंदे यांना 1, 59, 060 मते मिळाली आणि त्यांनी केदार प्रकाश दिघे यांचा 1, 20, 717 मतांनी पराभव केला. दिघे यांना केवळ 38, 343 मते मिळवता आली. काेपरी जागेवरील उर्वरित सात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. येथे नोटा च्या बाजूने 2676 मते पडली.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्यासाेबत गुवाहाटीला गेलेल्या पाच आमदारांना पराभवाचा झटका बसला आहे. शिंदे यांनी 2022 मध्ये गुवाहाटीला गेलेल्या सर्वांना निवडून आणले नाही, तर राजकारणातून निवृत्ती घेऊ असे म्हटले हाेते. शिदे यांच्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी झाली असली, तरी पाच आमदारांना मात्र पराभव स्वीकारावा लागला आहे. यामध्ये सदा सरवणकर, यामिनी जाधव, शहाजीबापू पाटील, संजय रायमूलकर आणि ज्ञानराच चाैगुले यांचा समावेश आहे. माहीममध्ये सदा सरवणकर यांचा तिरंगी लढतीत पराभव झाला. शहाजीबापू पाटील यांना सांगाेल्यात शेकापकडून पराभव स्वीकारावा लागला. भायखळ्यातून यामिनी जाधव पराभूत झाल्या. बुलढाण्यातून संजय रायमूलकर यांचा पराभव झाला. उमरग्यामध्ये ज्ञानराज चाैगुले यांचा पराभव झाला.

महायुतीच्या  विजयाची तीन कारणे

1. ’माझी लाडकी बहिण’ याेजनेमुळे महायुतीला महिलांची मते मिळाली
महायुतीच्या शिंदे सरकारने जून 2024 मध्ये ’माझी लाडकी बहिण’ याेजना सुरू केली. या याेजनेंतर्गत वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. जुलै ते ऑक्टाेबर या कालावधीत 2.34 काेटी महिलांना याचा लाभ मिळाला, जे राज्यातील एकूण महिला मतदारांपैकी जवळपास निम्मे आहे. निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ’महायुतीची सत्ता आल्यास याेजनेंतर्गत दरमहा 2100 रुपये दिले जातील’, असे आश्वासन दिले हाेते. अनेकांनी त्याचे काैतुक केले.
2. संघ मैदानात उतरला, सभा घेतल्या आणि भाजपसाठी मते मागितली
लाेकसभा निवडणुकीच्या काळात भाजप आणि संघाचे संबंध बिघडत असल्याच्या अनेक बातम्या येत हाेत्या. निकालात भाजप 240 जागांवर घसरला. या निकालाचा संबंध आरएसएस आणि भाजपमधील बिघडत चाललेल्या संबंधांशी असल्याचे दिसून आले. यानंतर हरियाणाच्या निवडणुकीत संघाने मजल मारली आणि भाजपने 48 जागा जिंकून हॅटट्रिक केली. महाराष्ट्रातही भाजपची मते मागण्यासाठी संघ मैदानात उतरला.
3. लाेकांना पटवून देण्यात महाविकास आघाडी मागे पडली
लाेकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संविधान, अदानी आणि आरक्षण हे मुद्दे केले हाेते. लाेकसभा निवडणुकीत भाजप 240 पर्यंत घसरला आणि काँग्रेसने आघाडीसह 99 जागा जिंकल्या, परंतु महाराष्ट्रात हे मुद्दे ेल ठरले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!