Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : १४० कोटी माझे कुटुंबीय , तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठीच मी खपत आहे : नरेंद्र मोदी

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : ५०-६० वर्षांपूर्वी जेव्हा मी घरातून बाहेर पडलो तेव्हा मला माहितही नव्हते की एक दिवस लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावणार आहे. त्यावेळी मला हे सुद्धा माहित नव्हते की १४० कोटी भारतीय माझे कुटुंब बनतील. मी स्वतःसाठी जगत नाही आणि मी माझ्यासाठी जन्माला आलेलो नाही, मी तुमच्या आणि तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप जीव तोडून मेहनत घेत आहे असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचे दिल्लीतील भाजप उमेदवार मनोज तिवारी यांच्या समर्थनार्थ जाहीर सभेला संबोधित करताना काढले.

या निमित्ताने आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, २०२४ ची ही निवडणूक भारताला पहिल्या ३अर्थव्यवस्थांमध्ये आणण्यासाठी आहे. २०२४ ची ही निवडणूक भारताच्या अर्थव्यवस्थेला अशा शक्तींपासून वाचवण्यासाठी आहे ज्यांना त्यांच्या आर्थिक धोरणांनी भारताला दिवाळखोरीत काढायचे आहे. २०२४ च्या या निवडणुका भारतातील तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करण्यासाठी आहेत.

Advertisements

नवीन संसद भवन आपल्याला अभिमानास्पद …

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, देशाच्या राजधानीला जगात प्रतिष्ठा मिळावी आणि देशाची राजधानी जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनली पाहिजे. त्यामुळे देशाला पुन्हा एकदा मोदी सरकारची गरज आहे. पंतप्रधान म्हणाले की, तुम्ही G20 परिषदेदरम्यान पाहिले आहे की, जगातील सर्वोच्च नेते दिल्लीला पाहून कसे आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की, आज येथे भारत मंडपम आणि यशोभूमी सारखी आधुनिक संमेलन केंद्रे बांधली जात आहेत. तसेच संसदेची नवीन इमारत आपल्या अभिमानात भर घालत आहे.

Advertisements
Advertisements

७० वर्षे सैनिकांना ‘पोलीस स्मारका’ची वाट पाहावी लागली…

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशाचे सैनिक ‘राष्ट्रीय युद्ध स्मारका’ची मागणी करत राहिले. देशाचे दुर्दैव बघा, मोदी येईपर्यंत देशातील सरकारांना देशातील शूर सैनिकांच्या सन्मानार्थ ‘वॉर मेमोरियल’ बांधण्याचे महत्त्व कळले नाही. पंतप्रधान म्हणाले की, देशातील लोकांचे रक्षण करताना सुमारे ३५ हजार पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत. यासोबतच ‘पोलीस स्मारका’साठी देशातील पोलीस कर्मचाऱ्यांना ७० वर्षे वाट पाहावी लागली. मोदी आले तेव्हा हे स्मारक बनवले.

दरम्यान काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केले, पण आज त्यांच्यात दिल्लीत ४ जागांवर लढण्याची ताकद नाही. ते म्हणाले की, जेथे १० जनपथचा दरबार आहे तिथेही काँग्रेस लढू शकत नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!