हॉटेलमध्ये बोलवून सर्वेक्षण अहवालावर सदस्यांकडून जबरदस्तीने घेतल्या सह्या…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मागासवर्ग आयोगाचा हा अहवाल आधी मंत्रिमंडळात मांडला जाईल. मग, 20 तारखेला बोलवण्यात आलेल्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात त्यावर चर्चा होणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच हा अहवाल विधिमंडळात मंजूर झाल्यानंतरच मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा पारित होऊ शकतो. हा अहवाला मराठा समाजाच्या बाजून असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान आता राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य मेश्राम यांनी सरकार आणि आयोगाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. सर्वेक्षण अहवाल सदस्यांना वाचू दिला नाही तसेच, सदस्यांकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या आहेत. सर्व सदस्यांना हॉटेलमध्ये बोलवून सह्या करायला लावल्या असा गंभीर आरोप मेश्राम यांनी केला आहे.
पुन्हा एकदा आयोगाकडून मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. जो अहवाल सरकारला दिला तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही. असा दावा मेश्राम यांनी केला आहे. कुठल्याही आयोगाने सरकारच बाहुल म्हणून काम करू नये. आयोगाने एकतर्फी काम केले आहे.
मी नियमावर काम करत होतो म्हणून मला काढलं असावं. सर्वेक्षण नीट झाले नाही असे मेश्राम यांनी संगीतले आहे. आयोगाचे सदस्य निष्पक्ष असावेत असे सुद्धा त्यांनी संगीतले आहे.
आरक्षणाचा फायदा काय?
मागास वर्ग आयोगाच्या या अहवालामुळे सर्व मराठा समाज आरक्षणाच्या कक्षेत येणार आहे. कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे.
जुन्या कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना तसेच त्यांच्या सग्या-सोयऱ्यांना ओबीसीमधून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच आंदोलन सुरु आहे. या आरक्षणाचा मराठा समाजाला नोकरी, शिक्षणात लाभ होणार आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765