आमच्या काळात बंड नव्हते, आम्ही एकत्र बसून निर्णय घ्यायचो : शरद पवार
अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली असून त्यांच्याविरोधात दिलेला उमेदवार निवडून आणणारच असे म्हणत अजित पवारांनी थेट आव्हान दिले आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पावारांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मी स्वत: संसदीय काम करतो. म्हणजे, मला त्यांचे निर्णय माहितच नसतात. उद्या त्यांच्या संसदीय कामात मी लक्ष देईन का? आणि सतत आमच्यामध्ये चर्चा होत असते.”
दरम्यान, मी नव्या लोकांना प्रोत्साहन देण्याची नेहमी काळजी घेतली, आमच्या काळात बंड नव्हते आम्ही बसून निर्णय घ्यायचो, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांना शरद पवारांचे अजित पवारांना प्रत्युत्तर देऊन टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, मी स्वत: संसदीय काम करतो. म्हणजे, मला त्यांचे निर्णय माहितच नसतात. उद्या त्यांच्या संसदीय कामात मी लक्ष देईन का? आणि सतत आमच्यामध्ये चर्चा होत असते. त्या जागेबद्दल काही व्यक्तिगत अडचणी असू शकतात, त्याची चर्चा होते.
पण अन्य कुठल्या बाबतीतील वाद त्यांनी कधी माझ्या कानावर घातला नाही, जो घातला तो, मतदार संघाच्या कामांसबंधित होता. पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकाचा जो-तो अधिकार आहे, प्रत्येक राजकीय व्यक्तीचा तो अधिकार आहे. त्यांचे उमेदवार निवडायचे बदलायचे, काय करायचे हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यावर भाष्य करण्याचे काही कारण नाही.
तुमच्या बंडात आणि अजित पवारांच्या बंडात काय फरक? आमच्या काळात बंड नव्हते. आम्ही बसून निर्णय घ्यायचो. यात कुठलीच तक्रार नसायाची. आज कुणी काय केले असेल, त्याच्याही तक्रार करायची कारण नाही.
फक्त पक्ष महत्वाचा आहे. त्याचा संस्थापक कोण राहिलेय? लोकांनी या पक्षाला मोठे केले. या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोरच आहेत. त्यामुळे त्याच्यावर अधिक काही भाष्य करण्याची गरज नाही. असे देखील शरद पवार म्हणाले.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765