AurangabadRenameUpdate : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला केंद्राचे शिक्कामोर्तब

अनेक वर्षांपासून वादग्रस्त असलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्यांच्या नामांतर प्रस्तावाला अखेर केंद्रा सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाचे नाव धाराशीव करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय यावर सचिव श्यामलकुमार भट्ट यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की , आपल्या २० ऑक्टोबर रोजीच्या पत्रानुसार औरंगाबाद जिल्यातील औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्यास हरकत नाही. या पत्राच्या प्रति सर्व संबंधितांना पाठवण्यात आल्याची माहितीही या पत्रात दिली आहे. औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण झाल्याबद्दल भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि ढोल वाजवून आपला आनंद व्यक्त केला.
दरम्यान याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कारण दाखवल्याचे म्हटले आहे.
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…! pic.twitter.com/IfXbdFec7r— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
अनेक वर्षांपासून वादग्रस्त मुद्दा
उस्मानाबाद आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे. १९८८ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याची घोषणा केली होती. १९९५ ला औरंगाबाद महापालिकेने हा ठराव घेतला होता. तत्कालीन मंत्रिमंडळाने अधिसूचनाही काढली होती. मात्र हे प्रकरण कोर्टात पोहोचले आणि नामांतर विरोधात निकाल लागला. दरम्यानच्या कालावधीत युती सरकार गेल्याने हा मुद्दा लांबणीवर पडला. मागील ३० वर्षांपासून शिवसेनाकडून सतत हि मागणी करण्यात येत होती.
#WATCH | Maharashtra | BJP and Shiv Sena workers burst crackers and play the drums as they celebrate the renaming of Aurangabad as Chhatrapati Sambhajinagar. pic.twitter.com/eFuyl2TUZ0
— ANI (@ANI) February 24, 2023
दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळणार असल्याचे चित्र स्पष्ट होताच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत नामांतराबाबतचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर येताच त्यांनी ठाकरेंच्या सर्व प्रस्तावांना स्थगिती आणली. यामुळे नामांतराचा प्रस्तावही स्थगित झाला. दरम्यान, पावसाळी अधिवेशनात शिंदे सरकारने औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारडे मंजुरीकरता पाठवण्यात आला होता.
न्यायप्रविष्ट होते प्रकरण
उस्मानाबाद आणि औरंगाबादचे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारकडून उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला मंजुरी मिळाली असून औरंगाबादच्या नामांतरासाठी केंद्राने मंजुरी दिली नसल्याची बाब स्पष्ट झाली होती. त्यामुळे केंद्रात आणि राज्यात एकच पक्ष असतानाही राज्य सराकारच्या प्रस्तावावर अद्यापही मंजुरी मिळत नसल्याने विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करत होते. अखेर, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती दिली.
श्रेयवादात पडणार नाही, पण…
दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, हे श्रेय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. सर्वप्रथम बाळासाहेबांनीच संभाजीनगर नावाची भूमिका मांडली होती. त्यानंतर आम्ही ९५ आणि ९६ साली हा प्रस्ताव मान्य केला, मात्र न्यायालयात प्रकरण अडकलं. आम्ही श्रेयवादात पडणार नाही, पण आता लवकरच औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजीमहाराजांराचे नाव द्यावं हीच उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी. बाळासाहेब ठाकरे यांची मागणी अनेक वर्षानंतर मान्य झाली यामुळे केंद्र सरकारचे आभार, अशी प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.
केंद्र सरकारचे अभिनंदन आणि आभार
अंबादास दानवे म्हणाले की, ९ मे १९८८ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी संभाजीनगर या नावाची घोषणा केली होती. दोन वेळा शिवसेनेच्या महापौरांनी महानगरपालिकेकडून हा प्रस्तावही पाठवला होता, मात्र याकडे कोणीही लक्ष दिले नाही. मविआचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला मान्य केलं. याबद्दल मी केंद्र सरकारचे अभिनंदन करतो आणि आभार मानतो.
Aurangabad is, was and will always be our city. Now wait for our show of strength for Aurangabad. A massive morcha for our beloved city! Get ready Aurangabadis to defeat these forces (BJP) playing politics in the name of our city. We condemn & we will fight. https://t.co/ItvoTHcXAB
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) February 24, 2023
इम्तियाज जलील यांचे ट्विट
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाचा निषेध करताना म्हटले आहे की , “औरंगाबाद आमचे शहर होते, आहे आणि राहणार आहे. आता औरंगाबादसाठी आमच्या ताकदीच्या प्रदर्शनाची प्रतीक्षा करा. आमच्या प्रिय शहरासाठी मोठा निषेध मोर्चा आम्ही काढू ! आमच्या शहराच्या नावावर राजकारण करणाऱ्या शक्तींना (भाजप) पराभूत करण्यासाठी आम्ही लढू.
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mini Truck / Chotta Hathi : For More details call now : 9762041481
LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-
We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.
For More details WhatsApp on: 9420379055