IndiaNewsUpdate : दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, “संघासारख्याच “पीएफआय ” शाखा तयार करते ….” एसएसपीच्या वक्तव्यावरून विवाद
पाटणा : बिहार पोलिसांनी संशयित दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या अतिरेकी संघटनेशी संबंधित तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पटनाचे एसएसपी मानवजीतसिंह ढिल्लन यांनी आरएसएसची तुलना पीएफआयशी केली. ते म्हणाले, ‘आरएसएस शाखांमध्ये ज्याप्रमाणे शारीरिक प्रशिक्षण दिले जाते, त्याचप्रमाणे पीएफआयमध्येही शारीरिक प्रशिक्षण दिले जात होते.’
@NitishKumar सरकार के लिए नयी मुश्किल ..अब पटना के वरीय पुलिस अधीक्षक ने पीएफ़आई और आरएसएस में समानता कैमरा पर बताया जो भाजपा के नेताओं को रास नहीं आ रहा @ndtvindia @Anurag_Dwary pic.twitter.com/J41caE9MyG
— manish (@manishndtv) July 14, 2022
एसएसपी मानवजीतसिंह पुढे म्हणाले की , ज्या प्रकारे आरएसएस आपली शाखा आयोजित करते आणि ज्यामध्ये लाठी वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते, त्याचप्रमाणे पीएफआय शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली तरुणांना प्रशिक्षण देत होते आणि आपल्या अजेंड्यासाठी प्रचार करून या निमित्ताने ते तरुणांचे ब्रेनवॉश करत होते. हे सर्वजण भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठीच्या कृती योजनेवर काम करत होते. त्यांच्याकडून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
@BJP4Bihar पटना के वरीय पुलिस अधीक्षक के बयान के उस अंश से नाराज़ हैं जहां उन्होंने आरएसएस और पीएफ़आई में समानता बतायी हैं और विधायक हरिभूषण ठाकुर बचौल ने या माफ़ी माँगने या सरकार से उनके ख़िलाफ़ कारवाई करने की माँग की हैं@ndtvindia pic.twitter.com/JxtTnwoDhD
— manish (@manishndtv) July 14, 2022
भाजपाची एसएसपी मानवजीतसिंह यांच्यावर टीका
एसएसपीच्या या वक्तव्यानंतर भाजपने हल्ला तीव्र केला आहे. भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बच्चौल म्हणाले की, या विधानातून एसएसपीची मानसिक दिवाळखोरी दिसून येते. एसएसपींनी माफी मागावी, अन्यथा सरकारकडून कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचवेळी भाजपचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनीही एसएसपीकडून वक्तव्य मागे घेण्याची आणि माफी मागण्याची मागणी केली आहे.
धर्मनिरपेक्ष भारत को इस्लामी देश बनाने की साजिश में लिप्त पीएफआई के संदिग्ध आतंकियों की गिरफ्तारी के बाद इस प्रतिबंधित संगठन से राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जैसे देशभक्त संगठन की तुलना करना नितांत निंदनीय और अज्ञानतापूर्ण है।
— Sushil Kumar Modi (मोदी का परिवार ) (@SushilModi) July 14, 2022
…तर यांनी केला एसएसपी मानवजीतसिंह यांचा बचाव
या वक्तव्यानंतर बिहार एनडीएमध्ये खडाजंगी सुरु झाली आहे. पाटणा एचएएम पक्षाचे प्रवक्ते डॉ दानिश रिझवान यांनी एसएसपी मानवजितसिंह यांचा बचाव करताना म्हटले आहे की, या प्रकरणात एसएसपीला जाणीवपूर्वक ओढले जात आहे. इस्लामिक स्टेटबद्दल बोलणे हा गुन्हा असेल, तर हिंदु राष्ट्राची वकिली करणे कोठून योग्य आहे? इस्लामिक राष्ट्राची संकल्पना मांडणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते, तर मग हिंदू राष्ट्राच्या गप्पा मारणाऱ्यांना मुक्त का?
@BJP4Bihar पटना के एसएसपी के बयान के विरोध के बाद @NitishKumar सरकार में सहयोगी हम पार्टी ने मानवजीत सिंह ढ़िल्लो का बचाव कर पूरे मामले को दिलचस्प बना दिया हैं @ndtvindia pic.twitter.com/F7Yn06r0nh
— manish (@manishndtv) July 14, 2022
एसएसपीने सांगितले की, आम्ही या संघटनेला बऱ्याच दिवसांपासून बरेच दिवस फॉलो करत होतो. आमच्या व्यतिरिक्त इतर अनेक सुरक्षा एजन्सीकडेही यासंबंधीचे इनपुट होते. पंतप्रधानांच्या भेटीबाबतही आम्हाला अनेक सूचना मिळाल्या होत्या, त्या आधारे आम्ही छापे टाकून या लोकांना अटक केली. आमची सोशल मीडिया मॉनिटरिंग टीमही त्यावर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले.
एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन म्हणाले की, आम्हाला कळले की ६ ते ७ जुलै दरम्यान तामिळनाडू आणि केरळमधून १० ते १२ लोक येथे आले आहेत, ज्यांना शारीरिक प्रशिक्षण दिले जात आहे. त्या आधारे आम्ही छापे टाकले ज्यात या लोकांना अटक करण्यात आली. तेथे अनेक कागदपत्रेही सापडली ज्यात भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याची चर्चा होती.
त्यांनी सांगितले की, या संदर्भात फुलवारी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा एक भाऊ सिमीचा सक्रिय सदस्य होता, ज्यावर बंदी घालण्यात आली आहे. तो तुरुंगातही गेला आहे. एसएसपी म्हणाले की, आम्हाला अशी काही कागदपत्रेही मिळाली आहेत, ज्यामध्ये भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेच्या विरोधात अनेक गोष्टी लिहिल्या होत्या.
भाजपाची तीव्र प्रतिक्रिया
यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भाजपचे प्रवक्ते मनोज शर्मा यांनी बिहारचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री नितीश कुमार यांना अशा धर्मांध आणि वाईट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला त्यांच्या पदावरून बडतर्फ करण्याची विनंती केली आहे. त्यांच्या पदावर राहिल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था आणि वातावरण बिघडू शकते. याची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घ्यावी. भारतीय जनता पक्ष असे वक्तव्य क्षणभरही सहन करणार नाही.
आरएसएस ही राष्ट्र निर्माण करणारी संस्था आहे. येथे भारतीय संस्कृती आणि सभ्यता मजबूत करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. येथे लोकांना एकता आणि अहिंसेचा धडा शिकवला जातो. पाटणाच्या एसएसपींनी एकदा आरएसएसच्या शाखेत जाऊन प्रशिक्षण घ्यावे, मग त्यांना कळेल की आरएसएसमध्ये कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या असभ्यतेबद्दल एसएसपींनी सामूहिक माफी मागितली पाहिजे असेही मनोज शर्मा यांनी म्हटले आहे.
पीएफआयची आरआरएसशी तुलना करणे दुर्दैवी..
तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते डॉ निखिल आनंद यांनी म्हटले आहे कि , आयएएस आणि आयपीएस अधिकारी राजकारणाच्या पलीकडे असतात. पण पाटणा एसएसपीने पीएफआयची आरआरएसशी तुलना करणे दुर्दैवी आहे. हे अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद विधान आहे. या वक्तव्याबद्दल पाटणाच्या एसएसपींनी माफी मागावी. त्यांना राजकारण करायचे असेल तर पदाचा त्याग करून राजकारण करावे. त्यांनी एका राष्ट्रवादी संघटनेची तुलना पीएफआयसारख्या संघटनेशी केल्याबद्दल माफी मागावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी.