Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पूर्ववैमनस्यातून चार वाहने जाळली, महिलेविरूध्द गुन्हा दाखल

Spread the love

औरंंगाबाद : पूर्ववैमनस्यातून घराजवळच राहणाऱ्यांची कार आणि तीन दुचाकी जाळून टाकण्यात आल्याची घटना २७ जानेवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास रांजणगांव-शेणपुंजी येथील शिवनेरी कॉलनी येथे घडली. याप्रकरणी वाहने जाळणाऱ्या महिलेविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविंद्र काशीनाथ कुलकर्णी (वय ५३, रा.शिवनेरी कॉलनी, रांजणगांव-शेणपुंजी) यांचे घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबासोबत गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे. २७ जानेवारी रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास कुलकर्णी यांच्या घराजवळ राहणाऱ्या महिलेने कार क्रमांक (एमएच-२०-डीव्ही-७१९४), दुचाकी क्रमांक (एमएच-२०ईएस-२७८६), (एमएच-२०-डीएम-५३४३) आणि (एमएच-२०-एई-८२८१) या चार वाहनांवर जळते कपडे टाकून चारही वाहने पेटवून दिली. या घटनेत चारही वाहने मिळून जवळपास १ लाख १५ हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याची नोंद कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीत केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!