राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून पराभूत होतील , त्यांनी इटलीला जावे , अमित शाह यांची टीका

लखनौ : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी उत्तर प्रदेशातील कन्नौज येथे एका सभेला संबोधित करताना समाजवादी पक्षाचे (एसपी) सुप्रीमो अखिलेश यादव आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, “या यादव कुटुंबाला राम मंदिराच्या अभिषेकासाठी बोलावले होते तेव्हा ते त्यांच्या व्होट बँकेसाठी गेले नाहीत. आम्ही त्यांच्या व्होट बँकेला घाबरत नाही. तुम्ही सर्व आमची व्होट बँक आहात. तर राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीतून हारणार आहेत त्यामुळे त्यांनी इटलीला जावे.
भाजपचे उमेदवार सुब्रत पाठक यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा येथे रॅली घेत होते. यावेळी ते म्हणाले, “यावेळी कन्नौजची जनता सुब्रत पाठक यांना पुन्हा विजयी करणार आहे. तुम्ही त्यांना आधी जिंकून दिले होते, तुम्ही त्यांना पुन्हा जिंकून द्या आणि मी त्यांना मोठा माणूस बनवणार आहे.” दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “राहुल गांधी अमेठी, वायनाड आणि रायबरेलीमध्ये जाऊन पराभूत होतील, त्यांनी नंतर फक्त इटलीला शिफ्ट व्हावे. राहुल गांधी पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेतात, त्यामुळेच पाकिस्तान त्यांची स्तुती करतो.”
दरम्यान , “जेव्हा कोरोना महामारी आली तेव्हा अखिलेश यादव आणि डिंपल यादव कुठेच दिसत नव्हते. त्यावेळी फक्त सुब्रत पाठक यांनी कन्नौजच्या लोकांसाठी उभे राहून त्यांना मदत केली होती. त्यावेळी अखिलेश यादव राज्यात असते तर उत्तर प्रदेशात मृतदेहांचा ढीग पडला असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशाला कोरोनापासून वाचवले.
सपाला भांडणासाठी इतर पक्षांची गरज नाही. ते आपापसात भांडण्यात व्यस्त असतात, त्यांच्या सभांमध्ये लाथा-बुक्क्या होतात. इथे वर्षानुवर्षे तुम्ही मुलायम सिंह यांच्या कुटुंबाला मतदान केले, पण हे असेच आहे.” जे कुटुंब जिंकूनही येत नाही आणि हरूनही येत नाही, ते घराणेशाही पक्ष आहेत, त्यांना कुटुंबाशिवाय दुसरे काही दिसत नाही.
गृहमंत्री अमित शाह पुढे म्हणाले, “शतकांपासून आपले कन्नौज परफ्यूमचा सुगंध जगभर पसरवत आहे . जेव्हा G20 चे पाहुणे आले, तेव्हा आमचे नेते PM मोदींनी सर्वांना कन्नौजचा परफ्यूम भेट दिला. इतकेच नाही तर रामललाला सुद्धा हेच परफ्यूम पाठवले.