AurangabadNewsUpdate : ब्रेक द चेन : खंडपीठ एक आठवडा बंद, तर जिल्हा न्यायालये रोज चार तास
Advertisements
Advertisements
औरंगाबाद – राज्यशासनाच्या आदेशानुसार राज्यातील खंडपीठे १२ एप्रिल ते १९ एप्रिल बंद राहणार असून जिल्हा न्यायालये उद्यापासून केवळ जामिन आणि रिमांड साठी सुरु राहतील असे आदेश उच्च न्यायालयाचे रजिस्र्टार जनरल एस.जी.दिगे यांनी जारी केले आहेत.
Advertisements
उद्या दि.७ एप्रिल पासून पुढील आदेश येई पर्यंत राज्यातील तसेच गोवा, दिव,दमण येथील जिल्हा न्यायालये रोज सकाळी दोन तास व दुपारी दोन तास केवळ रिमांड आणि जामिनासाठी सुरु राहतील.तसेच खंडपीठे ही १२एप्रिल पासून १९एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिगे यांनी जारी केले आहेत. मागिल वर्षीही न्यायालय प्रशासनाने कोव्हिड संसर्गामुळे हा निर्णय अमलात आणला होता.
Advertisements
Advertisements
