Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : अखेर फरार मिहीर शहा पोलिसांनी तीन दिवसांनी धरला ….BMW च्या धडकेत ठार केले होते महिलेला…

Spread the love

मुंबई : मासे आणण्यासाठी जाणाऱ्या कोळी दाम्पत्याला उडवून पळून गेलेला वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अखेर तीन दिवसांनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. 60 तासांनंतर पोलिसांना मिहीर शाहाला अटक करण्यात यश आले आहे. मिहीर शाह हा पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे. त्यामुळे या हायप्रोफाईल केसकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अपघातानंतर मिहीर शाह तीन दिवस फरार होता. मात्र, मिहीरचा 60 तासांचा खेळ, 15 मिनिटांत खलास झाला. सरम्यान या प्रकरणात त्याच्या चालकाला अडकवण्याचा प्रयत्न झाले पण त्याला यश आले नाही.

मिहीर शाहाने बीएमडब्ल्यूने वरळीत दुचाकीवरील नाखवा पती-पत्नीला उडवल्यानंतर त्याने महिलेला तसेच काही अंतरापर्यंत फरफटत नेले. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आणि पती जखमी झाला. यानंतर मिहीर शाहने पळ काढला. अपघातावेळी मिहीर शाहाचं गाडी चालवत होता आणि मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या अपघातानंतर मिहीर शाहला पळण्यासाठी आणि त्याच्या जागेवर शेजारी बसलेल्या चालकाला अडकविण्यासाठी त्यांच्या वडिलांनीच मदत केल्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.

आरोपी मिहीर शाह हा त्याचे मित्र आणि कुटुंबियांसोबत शहापूरला रिसोर्टमध्ये लपून बसला होता. मात्र त्यांनी स्वत:चे मोबाइल बंद ठेवल्यामुळे पोलिसांना त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. दरम्यान मिहीर हा त्याचा पालघर आणि बोरिवलीच्या एका मित्राच्या दुसऱ्या फोनवरून अनेकांशी संवाद साधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल रात्री दोन मित्रांसह मिहीर हा कुटुंबियांना न कळवता. विरारला आला. दरम्यान, आज सकाळी 15 मिनिटांसाठी मिहीरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला.

दरम्यान, मंगळवारी सकाळी मिहीरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाइल 15 मिनिटांसाठी सुरू केला होता. अवघ्या 15 मिनिटांत पुन्हा फोन बंद करण्यात आला. पण, हा फोन पोलिसांच्या सर्वेलन्सवर होता, त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं.

मिहिरचा फोन फक्त काही मिनिटांसाठी सुरु झाला होता, पण तेवढ्यात त्याच्या फोनचं लोकेशन पोलिसांना सापडलं. मिहीरच्या मोबाईलचं लोकेशन विरारला ट्रेस झालं. पोलिसांचा संशय बळावल्याने वरळी पोलिसांचे बोरिवली येथे असलेले पथक विरारच्या लोकेशनवर पोहोचलं. पोलिसांचे पथक विरारला घटनास्थळी पोहचल्यानंतर त्यांनी मिहीरला ताब्यात घेतलं, तर उर्वरित 12 जणांना शहापूरमधून ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!