Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : तिसऱ्या विजयासाठी भाजप तयार , ४४० हून अधिक जागा स्वतः लढवण्याचा निर्धार ४०५ जागांची घोषणा करून आघाडी…

Spread the love

नवी दिल्ली: यावेळी ४०० पारची घोषणा दिलेल्या भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप ४४० ते ४४५ जागा लढविण्याचे नियोजन केले असून पक्षाने आतापर्यंत ४०५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले माहीत. तर उत्तर प्रदेश, पंजाब, ओडिशा आणि अन्य काही राज्यांतील काही जागांसाठी उमेदवारांची घोषणा अद्याप बाकी आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील २५ उमेदवारांची नावे पक्षाने घोषित केली असून, आणखी किमान सहा नावे येत्या काही दिवसांत घोषित केली जाऊ शकतात.भाजपने स्वतःचे ३७० जागांचे आणि रालोआचे ४०० जागांचे विजयी लक्ष्य गाठण्यासाठी जवळपास सर्वच राज्यांत छोट्या पक्षांसोबत युती केली असून, मित्रपक्षांची संख्या ४० वर गेली आहे.

एनडीए ला अधिक मजबूत करण्यासाठी पक्षाने काही ईशान्य राज्यांतील जागांवरील आपला दावा सोडला आहे. भाजपने तिसऱ्यांदा विजयाचा संकल्प केल्यामुळे प्रसंगी पक्ष कार्यकत्यांच्या भावना दुखावून छोट्या- मोठ्या सर्व पक्षांतील नेत्यांना तिकीटवाटप केले आहे. विशेष म्हणजे यावेळी पक्षाने मंत्र्यांसह १०० हून अधिक विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारुन नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.

दरम्यान २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपने या वेळी अधिक पक्षांसोबत युती केली आहे. भाजपच्या मित्रपक्षांची ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. २०१९ मध्ये भाजपला आंध्र प्रदेशात एकही जागा मिळाली नव्हती त्यामुळे या वेळी तेथे पक्षाचे खाते उघडावे म्हणून एन. चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षासोबत युती करण्यात आली आहे. या युतीसाठी पंतप्रधान मोदी यांनी जोर लावला होता. तर तेलंगणामध्ये अन्य राज्यांप्रमाणेच भाजप स्वबळावर निवडणूक लढवत आहे. २०१४ मध्ये भाजपने ४२८ उमेदवार उभे केले आणि २८२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये ४३७ उमेदवार उभे करून ३०३ जागांवर विजय मिळवला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!