Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्ली चलो मोर्चा : 10 मार्चला होणार देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन… शेतकऱ्यांनी केली घोषणा

Spread the love

शेतकरी संघटनांनी ‘दिल्ली चलो’ आंदोलनाची नव्या रणनीतीची रूपरेषा स्पष्ट केली आहे. ते 10 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत आंदोलक शेतकरी देशव्यापी ‘रेल रोको’ आंदोलन करणार असल्याची घोषणा आंदोलक शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी केली आहे. शिवाय, ‘रेल रोको’ आंदोलनापूर्वी देशभरातील शेतकरी 6 मार्चला दिल्लीकडे कूच करतील, असे आंदोलक संघटनांच्या नेत्यांनी सांगितले आहे.

नव्या रणनीतीची रूपरेषा सांगताना शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले की, दिल्लीकडे कूच करण्याचा आमचा कार्यक्रम तसाच आहे, आम्ही त्यापासून मागे हटलो नाही.” सीमेवर आम्ही आमची ताकद वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

6 मार्च रोजी देशभरातील शेतकरी येणार दिल्लीत

6 मार्च रोजी देशभरातील शेतकरी ट्रेन, बस आणि विमानाने (दिल्लीला) येतील आणि सरकार त्यांना तिथे बसू देते की नाही ते आम्ही पाहू. 10 मार्च रोजी आम्ही देशभरात दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत ‘रेल रोको’ आंदोलन करणार आहोत.

याला दुजोरा देताना शेतकरी नेते सर्वन सिंह पंढेर म्हणाले, “आम्ही ६ मार्चला दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, १० मार्च रोजी दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत (देशभर) रेल्वे ट्रॅक रोखणार आहोत.

आंदोलनाला हिंसक वळण

उल्लेखनीय म्हणजे, 13 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यतः पंजाबमधील मोठ्या संख्येने शेतकरी पंजाब-हरियाणा सीमेवर बसले आहेत. आंदोलकांनी शेतकऱ्यांना सर्व पिकांवर हमीभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा आणि इतर अनेक मागण्यांसह दिल्लीच्या दिशेने मोर्चाला सुरुवात केली.

हिंसक आंदोलक आणि सुरक्षा कर्मचारी यांच्यात झालेल्या चकमकीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा दावा आंदोलकांनी केल्याने शेतकरी नेत्यांनी संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि किसान मजदूर मोर्चाच्या नेतृत्वाखाली केलेले आंदोलन दोन दिवस थांबवले होते.

खनौरी सीमेवर झालेल्या या चकमकीत 12 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनेक आंदोलकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याचेही हरियाणा पोलिसांनी उघड केले होते.

शेतकऱ्यांच्या निदर्शनांमध्ये व्यत्यय आल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी यापूर्वी सोमवारी हरियाणासह सिंघू, टिकरी सीमा बिंदूंवर सर्व्हिस लेन उघडल्या होत्या. शेतकऱ्यांच्या “दिल्ली चलो” मोर्चामुळे सीमा सील करण्यात आल्या.

सिंघू आणि टिकरी सीमेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षा दलांनी गेल्या आठवड्यात सिमेंटचे दोन मोठे अडथळे दूर केले होते. या मार्गिका खुल्या केल्याने वाहने त्यांच्या गंतव्यस्थानी सहज पोहोचू शकतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!