आरबीआयने ठोठावला पेटीएम बँकेला 5.49 कोटी रुपयांचा दंड
पेटीएमच्या अडचणीत आणखी वाढ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने कथित मनी लॉन्ड्रिंगसाठी पेटीएम बँकेला 5.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच पेटीएम बँकेची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच 15 मार्चपर्यंत तुम्ही पेटीएम बँक वापरू शकता. यानंतर ग्राहकांना इतर पर्याय शोधावे लागतील. अर्थ मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पेटीएम पेमेंट्स बँकेत असलेली बँक खाती बेकायदेशीर क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या संस्थांनी वापरली होती. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, या बेकायदेशीर ऑपरेशन्समधून मिळालेला निधी, म्हणजेच गुन्ह्यातून मिळालेला पैसा, पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडच्या खात्यांमधून व्यवहार केला गेला.
फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट-इंडिया (FIU-IND) ने PMLA (मनी लाँडरिंग प्रतिबंध कायदा) अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडवर 5.49 कोटी रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला असल्याचे अर्थ मंत्रालयाने सांगितले आहे.
एफआययूने FIU ने ही कारवाई आरबीआयच्या 31 जानेवारीच्या निर्देशानंतर केली आहे, ज्यामध्ये पेटीएम पेमेंट बँकेला 29 फेब्रुवारीपासून ग्राहकांच्या खात्यात नव्या ठेवी स्वीकारण्यास मनाई करण्यात आली होती. नंतर ही तारीख 15 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline www.mahanayakonline.com
For advertising call now: 9421379055 | 9028150765