Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट ५८ शेतकरी, १२ पोलीस जखमी

Spread the love

केंद्र सरकारचा प्रस्ताव धुडकावून लावत हजारो शेतकऱ्यांनी २१ फेब्रुवारीला राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच केली आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून हरियाणातील शंभू सीमेजवळ सरकारविरोधात एकत्र आले आहेत. मात्र, पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमा पार करण्यापासून रोखल्यामुळे आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार झटापट झाली.

यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या तसेच रबरी गोळ्या झाडल्या. या कारवाईत एका २३ वर्षीय तरुण शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय ५८ शेतकरी आणि १२ पोलीस जखमी झाले आहेत. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून शेतकरी आंदोलन दोन दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले आहे.

पिकांना हमीभाव मिळावा, तसेच शेतीकर्ज माफ करावे यासह विविध मागणीसाठी देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलन पुकारत चलो दिल्लीचा नारा दिला आहे. सरकारकडून शेतकऱ्यांची मनधरणी सुरू असून आंदोलन दडपण्याचा देखील प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये तब्बल ४ वेळा बैठका झाल्या आहेत.

मात्र, या बैठकीतून अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्रासोबत रविवारी (१८ फेब्रुवारी) चौथ्या बैठकीतील चर्चा फिस्कटल्यानंतर शेतकऱ्यांनी बुधवारपासून (२१ फेब्रुवारी) पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच सुरू केली. यावेळी जेसीबी, पोकलेन मशीन घेऊन शेतकरी हरियाणातील शंभू सीमेजवळ पोहचले.

पोलिसांनी शेतकऱ्यांनी सीमा पार करण्यापासून रोखले असता, दोघांमध्ये चांगलीच झटापट झाली. यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत रबरी गोळ्या झाडल्या. या कारवाईत तब्बल ५८ शेतकरी जखमी झाले आहेत. यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याशिवाय १२ पोलीस देखील जखमी झाले आहेत. शंभू सीमेवरील तणाव बघता शेतकऱ्यांनी आंदोलन दोन दिवस पुढे ढकलले आहे.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!