Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaReservationUpdate : राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर, मराठा आरक्षणाबाबाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री

Spread the love

मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानावरुन आज तातडीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल यावेळी सरकारला सादर करण्यात आला.

यावेळी बोलताना मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाईल असे सांगत जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे असे आवाहन करण्यात आले. २० फेब्रुवारी रोजी बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार याबाबत निर्णय घेईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबत जालन्यातील आंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सलग सातवा दिवस आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाष्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित असून ते मुंबईबाहेर असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मराठा समाजाचे आर्थिक, सामाजिक मागासलेपणं तपासण्यासाठी साडेतीन ते चार लाख जण दिवसरात्र, युद्ध पातळीवर जलदगतीने काम करत होते. सव्वादोन कोटींहून अधिक कुटुंबांचं सर्वेक्षण यात करण्यात आलं. मंत्रिमंडळात अहवालावर चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल. २० तारखेला विशेष अधिवेशनात याबाबत चर्चा होईल. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं, ओबीसी किंवा इतर समाजावर कुठलाही अन्याय न होता मराठा समाजाला आरक्षण देता येईल, असा विश्वास मला वाटतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आणि सकारात्मक असल्याचं ते म्हणाले.

जरांगे पाटील दुपारी स्पष्ट करणार भूमिका

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर दुपारी १ वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.  गेल्या काही दिवासापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने आरक्षणाबाब अधिसूचना काढली होती. या अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर व्हावे अशी मागणी सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले असून या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक असल्याचे समोर आले आहे. कोर्टाने त्यांना उपचार घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटलांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.

उपचार घेणार की नाही, हे आम्हाला १० मिनिटांत कळवा…

मराठा आरक्षणाबाबत सरकारने दिलेल्या आश्वासनांच्या अंमलबजावणीची मागणी करत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अत्यंत नाजूक झाल्याची माहिती समोर आली असून जरांगे हे उपचार घेण्यास नकार देत असल्याने राज्य सरकारने थेट हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टात याप्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान मनोज जरांगे हे उपचार घेणार की नाही, हे आम्हाला १० मिनिटांत कळवा, अशा सूचना कोर्टाने जरांगे यांच्या वकिलांना दिल्या होत्या.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!