ऊबदार गादीत झोपले कुटूंब… जीव गुदमरून झाला मृत्यू
उत्तर भारतात थंडीचा जोर अद्याप कायम असून, लोक थंडीपासून बचावासाठी आपल्या घरात शेकोट्या पेटवत आहेत. मात्र, शेकोटी घरात ठेवताना पुरेशी काळजी न घेतल्याने राजधानी दिल्लीत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. एका ठिकाणी आई-वडील आणि दोन मुले तर दुसऱ्या एका घटनेत दोघांचा घरातील शेकोटीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
उत्तर दिल्लीतील खेडा भागात आई-वडील आणि साधारण ७-८ वर्षांची दोन मुले झोपलेल्या स्थितीत मृतावस्थेत आढळून आली. एका घरातून धूर निघत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. प्राथमिक माहितीनुसार, या कुटूंबाचा मृत्यू घुसमट आणि गुदमरल्याने झाला आहे.
दुसऱ्या एका घटनेत, पश्चिम दिल्लीमध्ये दोन जणांचे मृतदेह घरात आढळून आले. त्यापैकी, एकाचे वय ५० तर दुसरा २८ वर्षे वयाचा होता. यांचाही मृत्यू जीव गुदमरून झाला असल्याचे दिसून आले. त्यांच्याही घरात कोळसे पेटवून शेकोटी करण्यात आली होती.
घरातील शेकोटीमुळे आग लागून किंवा धुराने जीव गुदमरून असे दुर्दैवी अपघात याआधीही झाले आहेत. तज्ज्ञांच्या मते, शेकोटी पेटविल्यानंतर घर पूर्णत: बंद केल्यामुळे हे अपघात झाले आहेत.
कोळसा पेटवून शेकोटी केल्यास कार्बन मोनॉक्साईडसारखे विषारी वायू निघतात. बंद घरात हे विषारी वायू प्राणघातक ठरतात. कार्बन मोनॉक्साईडमध्ये कार्बन जास्त प्रमाणात असतो. कार्बनमुळे मेंदू गुंग होतो आणि व्यक्ती बेशुद्ध होतो.
या बेशुद्धीत त्याच्या श्वासातून घातक कार्बन मोनॉक्साईड हा विषारी वायू शरीरात जाऊन रक्तात मिसळतो. ही एक संथ प्रक्रीया असून, हळूहळून मानवी शरीरातील हिमोग्लोबिन त्यामुळे कमी होऊन व्यक्तीचा मृत्यू होतो.
दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी : www.mahanayakonline.com
दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
MahanayakOnline
www.mahanayakonline.com
For advertising call now :
9421379055 | 9028150765