Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काश्मीरमध्ये मोबाईल-इंटरनेट सेवा बंद, तिसऱ्या दिवशीही भारतीय लष्कराची शोध मोहीम सुरू

Spread the love

जम्मू-काश्मीरच्या राजौरी आणि पूंछमध्ये शनिवारी (२३ डिसेंबर) सलग तिसऱ्या दिवशीही सुरक्षा दलांची दहशतवाद्यांसाठी शोध मोहीम सुरूच आहे. दरम्यान, राजौरी आणि पुंछमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान दहशतवाद्यांची कोणतीही खबर न मिळाल्यानंतर, दहशतवादी या भागातून पळून जाण्यात यशस्वी झाल्याचा लष्करी अधिकाऱ्यांचा संशय आहे. आजही भूगर्भीय कारवाईसोबतच सुरक्षा दल ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने राजौरी आणि पूंछच्या घनदाट जंगलात दहशतवाद्यांच्या शोधात मोहीम राबवत आहेत.

तीन जणांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला

गुरुवारी पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्यानंतर, शुक्रवारी घटनास्थळावरून तीन जण संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळून आले. त्यांची ओळख अद्याप उघड झालेली नाही.

पूंछचे उपायुक्त चौधरी मोहम्मद यासीन आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक विनय कुमार तिघांच्या मृत्यूच्या अहवालानंतर बुफलियाजला पोहोचले, तर जम्मूचे विभागीय आयुक्त रमेश कुमार हेही सुरनकोटला पोहोचले आहेत. हे लोक कोण होते, त्यांची हत्या कशी झाली या बाबत सध्यातरी सुरक्षा यंत्रणांकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे

दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल परिसराची हवाई पाळत ठेवत आहेत. यासाठी हेलिकॉप्टरसह ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. तसेच, लष्कराने जमिनीवर शोध मोहीम तीव्र केली आहे. या हल्ल्याचा काही सुगावा मिळवण्यासाठी भारतीय लष्कराने आतापर्यंत अनेक स्थानिक लोकांना ताब्यात घेतले आहे.

जम्मू-काश्मीर पोलीस, एसओजी आणि सीआरपीएफच्या मदतीने परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात असल्याचे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या भागात मदतीसाठी अधिक सुरक्षा दल पाठवण्यात आले आहेत.

या वर्षात 24 सुरक्षा जवान शहीद झाले आहेत

गेल्या तीन वर्षांत राजौरी-पुंछमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत नियंत्रण रेषेजवळील राजौरी आणि पूंछ जिल्ह्यात झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमध्ये २४ सुरक्षा जवान शहीद झाले असून ७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल 28 दहशतवादीही ठार झाले आहेत.

21 डिसेंबर रोजी दुपारी 4.45 च्या सुमारास राजौरी पुंछच्या सुरनकोट उपविभागातील डेरा की गली आणि बुफलियाज दरम्यानच्या घनदाट जंगलातील दानार सवानिया वळणावर दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला होता. यामध्ये चार जवान शहीद झाले असून तीन जखमी झाले आहेत. लष्कराच्या ज्या गाड्यांवर हल्ला झाला ते ऑपरेशनसाठी जात होते. परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते शोध मोहिमेसाठी जात होते.

सैनिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनावर दहशदवादी हल्ला तीन जवान शहीद


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!