Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

न्यायमूर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? भुजबळांची जरांगे पाटलांवर टीका

Spread the love

मराठा आरक्षण आंदोलनवरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरुच असतांना आता ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध सुरू आहे. आज राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात जालन्यामधील आंबड या ठिकाणी ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, न्यायमुर्ती त्याला सर सर म्हणत होते, तो पाचवी पास तरी आहे का? याद राख माझ्या शेपटी वर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात मिळावे झाले पाहिजेत. ओबीसींची संख्या जास्त असून महाराष्ट्रातही जातीय जनगणना ताबडतोब झाली पाहिजे.

अंतरवली सराटी येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावरुन ते म्हणाले, पोलिसांचा लाठीचार्ज सगळ्यांनी पाहिला, पण ७० पोलिस रुग्णालयात जखमी झाले, ते कोणी पाहिले नाही. पोलीस याला उठवायला गेले तेव्हा त्यावेळी जरांगे यांनी सर्व तयारी केली होती, पोलिसांवर दगडाचा मारा सुरु झाला.

७० पोलीस पाय घसरून पडले का त्यांना कोणी मारले? छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या सुनेला सुद्धा आई म्हणून परत पाठवले, त्या महिला पोलिसांवर दगडफेक केली. लाठीचार्ज झाल्यावर हे सरदार घरात जाऊन बसले. राज्यापुढे खरे चित्र आले नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनीच माफी मागितली आणि गुन्हे मागे घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे पोलिसांचे मनोबल खचले. असल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.

बीडमध्ये, प्रकाश सोळुंकेचे घर जाळले. त्यामागे एक ग्रुप नव्हता. कोड नंबर देण्यात आले होते. त्या ठिकाणी कोयते, चॉपर सापडले, पेट्रोल बॉंब सापडले. कोड नंबर दिले होते- १ नंबर प्रकाश सोळुंके आणि १२ नंबर राऊत हॉटेल असे नंबर दिले.

हॉटेल १२ – १५  कि. मी. वर होत त्याचा काय दोष होता, तो ओबीसी होता म्हणून हे केले. राखरांगोळी शब्द म्हणजे काय मी त्या दिवशी बीडमध्ये पाहिले. संदीप क्षीरसागर यांचे घर जाळले, त्यानंतर राऊतचे हॉटेल जाळले.

जयदत्त क्षीरसागर, संदीप सागर यांच्या घरात पेट्रोल बॉंब टाकले, त्यांची लेकरं बाळ पण घरात होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हाला दुसऱ्याची घरं जाळायलाच सांगितली? असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.

हा छगन भुजबळ स्वकष्टाचे खातो. तुझ्यासारखं सारसऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, असा टोला भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना लगावला आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. ५६ मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला. मात्र आम्ही कुणाचं घरं,दारं जाळली नाहीत, असेही भुजबळ म्हणाले.

 

India vs New Zealand : शानदार ऐतिहासिक विजय, असा झाला रोमहर्षक सामना…

 


Live Mahanayak news

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!